Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कार्तिक माहात्म्य - अध्याय २३

Updated: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:59 IST)
विजयानें त्याचा तो शाप ऐकून जयाला शाप दिला कीं, मदानें भ्रांत होऊन मला शाप दिलास, तर तूं मातंग म्हणजे हत्ती हो ॥१२॥
नंतर रोजच्याप्रमाणें ते विष्णूची पूजा करीत असतां त्यांनीं ती शापाची हकीकत प्रगट झालेल्या देवाला सांगितली व शापापासून मुक्तता व्हावी म्हणून रमापति भगवंताची प्रार्थना करुं लागले ॥१३॥
जय विजय म्हणतातः-- देवा ! आम्ही तुझ्या भक्तांनीं नक्र व हत्ती यांच्या जन्माला कसें जावें ? याकरितां दयासागरा, देवा ! आमचा शाप नाहींसा करा ॥१४॥
भगवान् म्हणालेः-- माझ्या भक्तांचे वचन कधींही खोटें होणार नाहीं तें भक्तवचन मला कधीं विरुद्ध करितां येत नाहीं ॥१५॥
मागें मी प्रह्लादाच्या वचनाकरितां खांबांत प्रगट झालों. अंबरीषाच्या वचनाकरितां गर्भवास सोसले ॥१६॥
म्हणून तुम्हींच परस्पर दिलेले शाप भोगून नंतर माझे अक्षयस्थानाला प्राप्त व्हा. असें म्हणून हरि अंतर्धान पावले ॥१७॥
गण म्हणतातः-- नंतर ते गंडकीनदीच्या तीरीं नक्र व हत्ती झाले. पूर्वपुण्यानें त्यांना पूर्वीच्या जन्माचें स्मरण राहून ते विष्णूची व्रतें व भक्ती करीत होते ॥१८॥
एकदां तो हत्ती कार्तिकमासीं गंडकींत स्नानाला गेला असतां, नक्राला शापाची आठवण होऊन त्यानें त्या हत्तीला धरिलें ॥१९॥
नक्रानें धरिलें तेव्हां त्या हत्तीनें विष्णूचें स्मरण केलें; तेव्हां शंख चक्र गदा धारण केलेले असे विष्णु तेथें प्रगट झाले ॥२०॥
त्यांनीं चक्र मारुन नक्र व हत्ती यांना बाहेर काढिलेंख व त्यांना भगवंतांनीं आपले रुप देऊन वैकुंठास नेलें ॥२१॥
तेव्हांपासून तें स्थान हरिक्षेत्र या नांवानें प्रसिद्ध झालें. चक्राच्या आघातामुळें तेथील धोंडे देखील चक्रचिह्नांकित झाले आहेत ॥२२॥
ते हे तूं विचारलेले प्रसिद्ध जय विजय नेहमीं विष्णूला प्रिय असणारे, देवाच्या द्वारांत आहेत ॥२३॥
याकरितां तूंही धर्म जाणून निरंतर विष्णुव्रत करुन मत्सर व गर्व सोडून सर्वांवर समदृष्टि ठेवणारा असा हो ॥२४॥
तूळ, मकर, मेष या संक्रांतीचे कार्तिक, माघ व वैशाख या महिन्यांत नेहमीं प्रातः स्नान कर एकादशीव्रत करुन तुलसीचें रक्षण कर ॥२५॥
ब्राह्मण, गाई व वैष्णव यांची सेवा कर. मसुरा, कांजी व वांगीं खाऊं नको. ॥२६॥
म्हणजे आमच्याप्रमाणेंच धर्मदत्ता ! तूं त्या विष्णूच्या भक्तीनें देह सोडल्यावर उत्तम जें विष्णूचें स्थान वैकुंठ, ते पावशील ॥२७॥
विष्णूला संतुष्ट करणारें हें व्रत, तूं जन्मापासून केलेंस त्यापेक्षा यज्ञ, दान, तप, तीर्थे हीं अधिक नाहींत ॥२८॥
हे ब्राह्मणश्रेष्ठा ! तूं धन्य आहेस; कारण तूं विष्णूला प्रिय असें कार्तिकव्रत केलेंस व त्याचें अर्धे पुण्य कलहेला मिळाल्यामुळें आम्ही विष्णूच्या वैकुंठलोकीं इला नेतों ॥२९॥
नारद म्हणतात - राजा ! याप्रमाणें धर्मदत्ताला उपदेश करुन, ते गण त्या कलहेसह विमानांत बसून, वैकुंठास निघून गेले ॥३०॥
प्रत्यक्ष अनुभव आलेला असा धर्मदत्त नित्य कार्तिकादिव्रत करीत असतां, देह सोडल्यावर तो दोन्ही स्त्रियांसहवर्तमान वैकुंठास गेला ॥३१॥
ही पूर्वी घडलेली कथा जो कोणी ऐकेल व दुसर्‍याला श्रवण करवील, त्याला विष्णूच्या कृपेनें हरीची प्राप्ति करुन देणारी बुद्धि उत्पन्न होईल ॥३२॥
इति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये त्रयोविंशोऽध्यायः ॥२३॥
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

Somvar Mahadev Mantra Jap सोमवारी करा महादेवाच्या मंत्रांचा जप

आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने या क्षेत्रांमध्ये फायदे होतात, रविवारला विशेष महत्त्व

संकष्टी चतुर्थी: गणपतीला अर्पण करा या ३ गोष्टी, विघ्ने दूर होण्याची मान्यता

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

पुढील लेख
Show comments