Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंज म्हणजे काय? नेमकी कितव्या वर्षी उपनयन संस्कार विधी केला पाहिजे?

Updated: मंगळवार, 6 मे 2025 (18:27 IST)
शारीरिक दृष्टिकोनातून मेंदूला थंडावा मिळतो. धार्मिक दृष्टीने, ब्रह्मज्ञान प्राप्तीचा बिंदू (सहस्रार चक्र).
अभ्यंगस्नान- यानंतर अभ्यंगस्नान करुन सोवळं-उपरणे घालून मुलगा या बटूवेशात मुंजीसाठी तयार होतो.
मातृभोजन- व्रतबंध संस्कारात मातृभोजनाला विशेष महत्त्व आहे. आईच्या ताटात आईच्या हातून शेवटचं जेवायचं ही पद्धत असते. यानंतर बटूला अनेक नियम पाळावे लागतात. त्यापैकी सर्वात पहिला नियम म्हणजे उष्ट अन्न वर्ज्य करणे कारण उष्ट्या अन्नामुळे बुद्धी भ्रष्ट होते, म्हणून बटूने शुद्ध, सात्विक अन्न घ्यावे, परान्न टाळावे हा यामागचा हेतू असतो.
मंगलाष्टक - यानंतर मंगलाष्टके गात अक्षता घालत बटूला आशिर्वाद दिले जातात.
उपनयन होम किंवा यज्ञोपवीत धारण - गुरु शिष्याला पवित्र त्रिपुंड धागा (यज्ञोपवीत) अर्पण करतो. तो डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली असतो.
मौंजीबंधन- मुंज नावाच्या गवताची दोरी वळून ती कमरेभोवती मेखलेप्रमाणे धारण करतात. पळसाच्या झाडाचा दंड बटूकडे सोपविला जातो.
गायत्री मंत्र उपदेश: गुरु शिष्याच्या कानात गायत्री मंत्र सांगतो. हाच क्षण उपनयनाचा केंद्रबिंदू आहे.
मेधाजनन : स्मरणशक्ती वाढावी यासाठी हा विधी केला जातो. 
भिक्षाटन: शिष्य काही घरांमध्ये भिक्षा मागतो. याचा अर्थ अहंकार न ठेवता ज्ञानासाठी विनम्र राहावे.
गुरुदक्षिणा: गुरुला दक्षिणा अर्पण केली जाते.
ब्रह्मचारी व्रत: आता मुलगा ब्रह्मचारी म्हणून वागत असल्याचे घोषित होते.
संध्या-वंदनाची दीक्षा: दररोज सकाळ-संध्याकाळ गायत्री मंत्राने संध्या करणे शिकवले जाते.
ALSO READ: मुंज मंगलाष्टके
उपनयनानंतर काय करावे?
दररोज संध्या-वंदन.
गायत्री मंत्र जप.
धार्मिक आचरण, व्रत, संयम.
योग्य वेळी गुरुकुल / शिक्षण संस्था यामध्ये प्रवेश.
 
उपनयनाचे आध्यात्मिक महत्त्व:
द्विजत्व म्हणजे केवळ शरीराने नव्हे, तर मनाने व आत्म्यानेही नवजीवन प्राप्त करणे.
ज्ञानप्राप्तीसाठी सज्ज होणे.
आत्मशुद्धी, कर्तव्यपरायणता आणि धर्माचरणाची सुरुवात.

सर्व पहा

Shubham Karoti Kalyanam शुभं करोति कल्याणम्, संध्याकाळी दिवा लावताना म्हणायची प्रार्थना

दीपपूजन २०२६: दिव्याची अमावस्या कधी आहे? या दिवशी दिव्यांची पूजा का केली जाते?

नागद्वारची आरती....आरती नागद्वारा शेषशाई अवतारा

श्रावणात महादेवांना बेलपत्र वाहण्याचे महत्व; significance of Belpatra

महादेवांचे सर्वाधिक लाडके हे ४ मूलांक; आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची कधीच कमतरता भासत नाही

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments