Dharma Sangrah

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय २६

Updated: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (14:05 IST)
 
सुमारे घटिका रात्र राहिल्यावर एक जकातदार शौचास जात होता. त्यास विक्रमानें एकांतीं सांगितलें कीं, गांवाबाहेर जे व्यापारी आले आहेत त्यांच्यापाशीं जकातीचा पैसा तुम्ही मागूं नका त्याच्याऐवजीं मी तुम्हांस तिप्पट रक्कम देईन. तुम्हीं त्यांना तो पैका माफ करून भर्तरी नांवाच्या मुलास माझ्याकडें घेऊन यावें. तो माझ भाऊ आहे. तो माझ्या हवाली कराल तर तुम्हांस अतोनात पुण्य लाभेल. अशा प्रकारें विक्रमानें जकातदाराची विनवणी केली व द्रव्यलोभस्तव जकातदारानें वचन देऊन विक्रमाचें म्हणणे कबुल केले.
 
पुढें कचेरींत आल्यावर जकातदारांनें शिपाई पाठवून त्या व्यापार्‍यांस बोलावून आणलें आणि मालाची टीप करून दस्तुरीच्या पैक्याचा आंकडा केला. मग तुम्हांमध्यें भर्तरी नांव कोणाचें आहे म्हणून त्यानें व्यापार्‍यांस विचारलें. तें ऐकून व्यापार्‍यांनीं भर्तरीस बोलावून जकातदारास दाखविलें. त्यास पाहतांच त्याच्या तेजावरून हा कोणी तरी अवतारी असावा, असें जकातदारास वाटलें. त्यानें व्यापार्‍याच्या मुख्यास एकीकडे नेऊन सांगितलें कीं, तुमच्याकडे जकातीचा जो आंकडा येणें आहे; त्याची मी तुम्हांस माफी करून देतो; पण तुमच्याकडे जो भर्तरी आह, त्यास कांहीं दिवस आमच्याकडे राहूं द्या. असे बोलून त्यानें त्यास पुष्कळ प्रकारें समजावून वळवून घेतलें.
 
मग व्यापार्‍यानीं भर्तरीस दोन गोष्टी सांगुन त्यास खूष केलें व ऐवज वसूल करून त्यांतून जकातीची रक्कम घेण्याबद्दल जकातदरास सांगितल्यावर भर्तरीस जकातदाराच्या स्वाधीन केलें. तसेंच माल विकून कोणाकडे काय येणें राहिलें आहे. हें जकातदारास माहीत आहे, यास्तव ह्यांच्या मार्फतीनें सारा वसूल कर, तुला जी मदत लागेल ती हे करतील, असे भर्तरीस बजावून व त्यास जकातदाराकडे ठेवून व्यापारी निघून गेले.
 
मग जकातदारानें विक्रमास बोलावून आणिलें व त्यास जकातीच्या रकमेच्या आंकडा दाखवून तो सर्व पैसा भरावयास सांगितलें तेव्हां विक्रमानें आपल्याजवळचें एक रत्‍न जकातीचा ऐवज पटेपर्यंत त्याच्याजवळ गहाण ठेविलें आणि सांगितल्यें कीं, तूर्त भर्तरीस माझ्याकडे नुसता भोजनास पाठवीत जा. पुढें हळूहळू ओळख पटेल. असें विक्रमाचें मत पाहून जकातदारानें भर्तरेच्या देखत विक्रमास सांगितलें कीं, आमचा हा गडी आहे; ह्याची भोजनाची सोय तुजकडे कर. तुझी आई स्वयंपाक करील व शिधा मी येथून धाडीत जाईन. याप्रमाणें ठरल्यावर त्याचीं बोलणें विक्रमानें मान्य केलें व भर्तरीस घेऊन तो आपल्या घरीं गेला. घरीं ओटीवर चार घटका उभयंतांचे बोलणें झालें. मग विक्रमानें रात्रीं झालेला हा सर्व प्रकार आईस सांगितला, तेव्हां तिला अति आनंद झाला.
 
मग पुत्राप्रमाणेंच भर्तरीचें संगोपन करण्यासाठीं विक्रमानें आईस सांगितलें . भोजन झाल्यावर भर्तरी तेथेंच राहिला. तो जकातदाराकडे गेला. तेव्हां त्यास सांगितलें कीं, तूं विक्रमाच्याच घरी राहा मला कारण पडेल तेव्हां मी तुला बोलावीन. मग भर्तरी विक्रमाकडे राहूं लागला, ती दोघें मायलेक भर्तरीवर अतिशय ममता करीत व तीं तिघें अगदीं आनंदानें वागत.

सर्व पहा

भगवान पांडुरंग विटेवर का उभे आहेत? जाणून घ्या भक्त पुंडलिकाची अद्भुत कथा

शुक्रवार व्रत विधी: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग आज वैभव लक्ष्मीची पूजा करताना या '६' चुका टाळा

शुक्रवारी ह्या वस्तू दान केल्याने सर्व समस्या नाहीश्या होतात

देशातील एक असे अद्वितीय शिवमंदिर, जिथे शिवलिंगाला पाणी अर्पण केले जात नाही

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments