Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Varuthini ekadashi 2021: वरुथिनी एकादशी व्रत पूजा विधी, नियम आणि फळप्राप्ती

Updated: सोमवार, 3 मे 2021 (13:53 IST)
8. दिवसभर विष्णूंचे स्मरण करत राहावे तसंच रात्री पूजा स्थळी जागरण करावे.
9. एकादशीच्या दुसर्‍या दिवशी द्वादशीला व्रत सोडावे. हे व्रत पारण मुहूर्तावर सोडावे. व्रत सोडल्यावर ब्राह्मण किंवा एखाद्या गरीब माणसाला अन्न द्यावे.
 
व्रताचे नियम :
कांस्यं मांसं मसूरान्नं चणकं कोद्रवांस्तथा।
शाकं मधु परान्नं च पुनर्भोजनमैथुने।।
- भविष्योत्तर पुराण
 
1. या दिवशी कांस्य भांड्यात अन्न खाऊ नये.
2. उपास करत नसला तरी मांस आणि मसूर खाऊ नये.
3. चणे किंवा कोदो भाज्यांचे सेवन करु नये. सोबतच मधाचे सेवन करणे निषिद्ध मानले जाते.
4. एकाच वेळी फळाहार करावा.
5. या दिवशी शारीरिक संबंध ठेवू नये.
6. या व्यतिरिक्त विडा खाणे, दात घासणे, मीठ-तेल किंवा अन्नाचे सेवन वर्जित मानले गेले आहे.
7. या दिवशी जुगार खेळणे, क्रोध करणे, खोटे बोलणे किंवा इतरांची निंदा करणे योग्य नाही. कुसंगती टाकून द्यावी.
 
व्रताचे फळ:
1. वरुथिनी एकादशी सौभाग्य प्रदान करणारी, पापांचा नायपाट करणारी आणि मोक्ष प्रदान करणारी आहे.
2. वरुथिनी एकादशीचे फळ दहा हजार वर्षांपर्यंत तप करण्यासमान आहे.
3. वरुथिनी एकादशी व्रत पालन करणे म्हणजे कुरुक्षेत्रात सूर्यग्रहण दरम्यान एक मन स्वर्णदान करण्यासमान आहे.
4. वरूथिनी एकादशी व्रत केल्याने मनुष्य या लोकात सुख भोगून परलोकात स्वर्गाला पोहचतो.
5. शास्त्रांमध्ये अन्नदान आणि कन्यादान हे सर्वात मोठे दान असल्याचे मानले गेले आहे. वरुथिनी एकादशीच्या व्रताने अन्नदान आणि कन्यादान या दोघांनाही समान फळ मिळते.
6. या व्रताचे महात्म्य वाचल्यास हजार गायींचा दान केल्याचे पुण्य लाभतं. याचे फळ गंगा स्नानापेक्षा अधिक असल्याचे समजले जाते.
7. या दिवशी खरबूज दान करावे.

सर्व पहा

शुक्रवारी करा वैभवलक्ष्मीचे हे सोपे उपाय, घरात नांदेल सुख-समृद्धी

Mahalaxmi Pujan on Friday महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी करा हे 4 उपाय

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

Sai Baba Puja Mantra गुरुवारी करा साईबाबांची पूजा, उपवासाचे नियम मंत्र जाणून घ्या

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments