व्हेटोपेक्षाही अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत. सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यांकडे व्हेटोचा अधिकार आहे. यामध्ये रशिया, चीन, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सचा समावेश होतो. यातील एकाही देशाला हा अधिकार सोडायचा नाही व दुसऱ्या देशाला हा अधिकार देण्यात येऊ नये, असाही त्यांचा सूर आहे. त्यामुळे सुरक्षा परिषदेत भारताला सहभागी होता आलेले नाही. भारताने व्हेटो अधिकाराचा हट्ट सोडला पहिजे, असे हेली यांनी सांगितले आहे.