कंपनीचा मूळ हेतू पतंजलीसारख्या दलिया, कॉर्नफ्लेक्स, ओट्स यांसारख्या पदार्थांशी स्पर्धा करणे हा आहे. पदार्थ जास्त काळ टिकावेत यासाठी पदार्थांमध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांमुळे भारतात अशापद्धतीचे पदार्थ कमी प्रमाणात खरेदी केले जातात. आयुर्वेदातून आलेल्या पदार्थांच्या रेसिपींना पुढे आणणे आणि भारतीय लोकांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी कंपनीने अन्नपदार्थांच्या क्षेत्रात प्रवेश केला असून येत्या काळात त्याचे लोकशाहीकरण केले जाईल असे कंपनीच्या कार्यकारी संचालक गितू वर्मा यांनी सांगितले.