Dharma Sangrah

दिल्ली सारखी आता मुंबई प्रदूषण झाले धुके नाही ते तर धुरके

सोमवार, 12 नोव्हेंबर 2018 (09:33 IST)
आता जसा हिवाळा येतोय तसे वातावरण बदलत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई सुद्धा बदलत आहे मात्र कारण थोडे वेगळे आहे. सध्या मुंबईत सकाळी हवेत जाणवणारा गारवा, दिसणारे धुरकट वातावरण यामुळे धुकेच पसरले आहे की काय? असे वाटते. मात्र हे धुके नक्कीच नाही तर  धूलिकण आणि प्रदूषण धूरमिश्रित धुरके आहे असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पहाटे वातावरणात गारवा जाणवत असला तरी ती थंडी नाही. मुंबईत थंडीचे आगमन डिसेंबरच्या मध्यानंतरच होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईचे ‘हिवाळी’अधिवेशन लांबणार असल्याचे दिसते आहे. त्यामुळे आता मुंबई देखील दिल्लीच्या वाटेवर आहे असे दिसते. दिवाळीतील फटाक्यांमुळे सध्या हवेची गुणवत्ता घसरली आहे. त्यातच वातावरणातील धूलिकण आणि धूर, आर्दतेचे वाढलेले प्रमाण यामुळे मुंबई धुरक्यात हरवली आहे. वांद्रे, अंधेरी, वरळी, प्रभादेवी, कुलाबा या भागांमध्ये पहाटे आणि सायंकाळच्या वेळी धुरक्याची जणू चादरच पसरली आहे. धुरक्यामुळे नाकातून पाणी येणे, डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे या लक्षणांनी मुंबईकर हैराण झाले आहेत. त्यामुळे आता भविष्यात मोठा प्रश्न निर्माण होणार हे मात्र नक्की.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

जळगावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून चार मुलांची हत्येच्या आरोपीला सहा वर्षांनंतर फाशीची शिक्षा

LIVE: युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीमध्ये एका भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन

संरक्षण क्षमतेला एक नवीन आयाम मिळणार; भारत २०,००० कोटी रुपयांचे स्वदेशी ड्रोन खरेदी करणार

'इंडिया' आघाडीत बिघाड? द्रमुक-काँग्रेस वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

पुढील लेख
Show comments