भाजपच्या विजयी आणि आघाडीवर असणाऱ्या उमेदवारांचा आकाडा ११३वर पोहोचला होता. त्यामुळे भाजपमध्ये उत्साही वातावरण होतं. मात्र काही वेळात हा आकडा १०४ इतका खाली आला. त्याच दरम्यान, काँग्रेसनं जेडीएसला मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊन आपल्या सोबत घेतलं. ते एकत्र आल्यास सत्ता स्थापन करणं त्यांना शक्य होणार आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे. गोव्यात भाजपनं अशीच खेळी केली होती.आता सगळं लक्ष राज्यपालांकडे लागलं आहे. मात्र संपूर्ण निकाल आल्याशिवाय कोणत्याही पक्षाला निमंत्रण देणार नाही, असं कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी स्पष्ट केलं आहे.