Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना काळात आपली संपत्ती कशी वाढवता येईल, योग्य गुंतवणूक कुठे करावी जाणून घ्या

Updated: बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (12:12 IST)
 
अशात सध्या आपल्या बचतीचं काय करावं हे कळतच नाही. परंतु जेव्हा कोरोनाचा उद्रेक संपेल तेव्हा हा क्षण आपल्याला एका गमावलेल्या संधी सारखा वाटेल. मग आपण आपल्या अतिरिक्त बचतीचे काय करणार ? या महामारीमुळे आपल्याला चांगलाच धडा मिळाला आहे की अचानक झालेल्या घटनांसाठी आपत्कालीन निधी ठेवणं देखील आवश्यक आहे. आपली बचत एखाद्या बँकेच्या खात्यात किंवा कमी जोखमीतील लिक्विड फंडात राखून आपण एक आकस्मिक निधी तयार करा.
 
कंटिजेसी फंड (आकस्मिक निधी) आपले संरक्षण करू शकते - वैयक्तिक खर्चासाठी 24 महिन्याचा हा कंटिजेसी फंड किंवा आकस्मिक फंड अश्या अनपेक्षित परिस्थितींमध्ये आपले संरक्षण करू शकते. आकस्मिकता निधीची संकल्पना समजून घेणारे लोकं घर चालविण्यासाठीच्या एक किंवा दोन महिन्यांचा मासिक खर्च वाचवून प्रारंभ करू शकतात. महामारीच्या या दरम्यान आपल्या आर्थिक ध्येयांचा पुनः विचार करावा.
 
पोर्टफोलिओ मध्ये संतुलन ठेवा - आपल्या सध्याच्या गरजांची काळजी घ्या, परंतु अश्या पोर्टफोलिओ किंवा फंड तयार करण्याकडे लक्ष द्या, जे कोणत्याही परिस्थितीत आपले संरक्षण करू शकेल. या काळात बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. उदाहरणार्थ कोविड -19 महामारी किंवा साथीच्या रोगांनी कदाचित काही वेळा साठी आर्थिक क्रियाकलाप आणि जीवनात अडथळा आणला आहे. शक्यता आहे की आपण या पूर्वी जी गुंतवणूक केली आहे, ती भविष्यात कामी येऊ शकणार नाही. आवश्यक असल्यास आपण आपल्या पोर्टफोलिओला पुन्हा संतुलित करा.
 
जोखमीच्या क्षमतेचं पूर्णपणे मूल्यांकन करा - क्वांटम म्युच्युअल फंड कंपनी गुंतवणूकदारांना सूचित करते की आपण उपलब्ध संधी बघा आणि योजना आखून मालमत्तेच्या वाटपासाठी समजूतदारीनं आपले पैसे कसे गुंतवायचे याचा निर्णय घ्या. आपली मालमत्ता वाटप पुन्हा संतुलित करण्यापूर्वी आपल्या क्षमतेची चाचणी घ्या. आणि शेवटी, आपल्याला असे वाटेल की आपल्याला आपल्याच पैशांची पुन्हा गुंतवणूक करण्यासाठी मानसिकरीत्या कमी कष्ट करावे लागले. 
 
पण महामारी किंवा साथीच्या या रोगाच्या उद्रेक दरम्यान आपल्या कमाईला वाढविण्यासाठी निरोगी राहणं खूप आवश्यक आहे. कुठे ही बाहेर जाताना सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांना पाळा आणि सावधगिरी बाळगा. आपली गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि आपण आनंदी राहा.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

गणेशोत्सवात मंडपात 'महाप्रसाद' वाटण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर मुंबईच्या परळ भागात तणाव

महाराष्ट्रात H1N1 इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढला; १,१०९ रुग्णांची नोंद, त्यापैकी ६५% रुग्ण पुणे आणि मुंबईतील

Central Railway Updates: टिटवाळा स्थानकावर २८ ऑगस्टपासून १५ दिवसांचा 'मेगा ब्लॉक'; अनेक लोकल गाड्या रद्द होणार

नेपाळमधील पुरामुळे हत्ती वाहून भारतात आले; त्यांची अवस्था पाहून लोकांचे मन हेलावले

पुढील लेख
Show comments