Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Jio चे दोन नवीन प्लॅन

Updated: सोमवार, 3 ऑगस्ट 2020 (22:01 IST)
 
आम्ही तुम्हाला जिओकडे असलेल्या 400 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या दोन प्रीपेड प्लॅनबाबत माहिती देणार आहोत. या दोन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना 84जीबी डेटा मिळतो. यातील एका प्लॅनमध्ये दररोज 3जीबी डेटा ग्राहकांना मिळतो, तर दुसरा प्लॅन दुप्पट व्हॅलिडिटीसह येतो.
 
रिलायन्स जिओचा 399 रुपयांचा प्लॅन :- (JIO New Recharge Plan) 
जिओचा हा दररोज 1.5 जीबी डेटा देणारा प्लॅन आहे. 399 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 56 दिवसांची वैधता मिळते. म्हणजे एकूण 84जीबी डेटा ग्राहकांना वापरण्यास मिळतो. याशिवाय कॉलिंगसाठी युजर्सना जिओच्या नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 2000 नॉन-जिओ मिनिटे मिळतात. तसेच, दररोज 100 एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचं मोफत सब्स्क्रिप्शनही मिळेल.
रिलायन्स जिओचा 349 रुपयांचा प्लॅन :-(JIO New Recharge Plan) 
जिओच्या 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये केवळ 28 दिवस व्हॅलिडिटी मिळेल. पण यामध्ये ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटा मिळतो. म्हणजे 28 दिवसांमध्ये एकूण 84 जीबी डेटा ग्राहक वापरु शकतात. यामध्ये युजर्सना जिओच्या नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 नॉन-जिओ मिनिटे मिळतात. याशिवाय दररोज 100 एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचं मोफत सब्स्क्रिप्शनही मिळेल.
कोणता प्लॅन सर्वोत्तम – ? (JIO New Recharge Plan) 
जर तुम्ही इंटरनेटचा जास्त वापर करत असाल तर तुमच्यासाठी 349 रुपयांचा प्लॅन उत्तम पर्याय ठरु शकतो. कारण यामध्ये दररोज 3 जीबी डेटा मिळतो. पण जर डेटासोबतच तुम्हाला वैधताही पाहिजे असेल तर 399 रुपयांचा प्लॅन चांगला पर्याय आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

यवतमाळच्या बोरगाव धरणावर सहलीसाठी गेलेल्या कॉलेजच्या दोन विद्यार्थिनी सेल्फी काढताना बुडाल्या

LIVE: 'कॉकरोच जनता पार्टी' स्वातंत्र्यदिनी हिंगोली जिल्ह्यात शाळा सुधारण्यासाठी उपक्रम सुरू करणार

किश्तवारमध्ये मोठा अपघात, महिंद्रा स्कॉर्पिओ चिनाब नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

हातात इंजेक्शन आणि औषधे पण डॉक्टरी पदवी नाही! मुंबईत बनावट डॉक्टरांचा पर्दाफाश

'शाळा ठीक करा' अभियान; स्वातंत्र्यदिनी हिंगोलीमध्ये सीजेपीकडून घोषणा

पुढील लेख
Show comments