Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर होऊ शकत नाही म्हणणारे 'व्यावसायिक निराशावादी': नरेंद्र मोदी

Updated: शनिवार, 6 जुलै 2019 (14:42 IST)
 
जितका मोठा केक असेल तितका मोठा तुकडा तुम्हाला मिळेल अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे असं मोदींनी म्हटलं. पुढे ते म्हणाले की जितकी मोठी अर्थव्यवस्था असेल तितका लोकांना फायदा होईल हे लक्षात घेऊन देशाची अर्थव्यवस्था वाढवण्यास हातभार लावावा.
 
हे लक्ष्य गाठू शकणार नाही अशी टीका काही लोक करत आहेत. ते लोक व्यावसायिक निराशावादी आहेत. सरकारच्या धोरणांवर टीका करण्याचा त्यांना अधिकार आहे पण हे लक्ष्य आम्ही गाठूच शकत नाही असं ते कसं म्हणू शकतात असा प्रश्न मोदींनी केला.
 
सध्या आपण अन्न-धान्यासाठी स्वयंपूर्ण आहोत. भविष्यात जास्तीत जास्त निर्यात कशी करता येईल यासाठी प्रयत्न केले जातील असं पंतप्रधान म्हणाले.
 
देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न निर्यात करण्याची व्यवस्था करण्यात येईल. शेतकरी जे काही करत आहे त्यात व्हॅल्यू अॅडिशन करून त्याचं उत्पन्न वाढवण्याचं सरकारचं धोरण आहे.
 
गरीबी हा सद्गुण समजला जातो ही खेदाची बाब आहे असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. गरीबीमध्ये लोकांना एक गौरव वाटतो, अभिमान वाटतो ही वाईट गोष्ट आहे. आपण ऐकलं असेल जेव्हा सत्यनारायणाची कथा सांगितली जाते तेव्हा म्हटलं जातं एका गावात एक गरीब ब्राह्मण होता. गरिबीमध्ये काय अभिमानाची गोष्ट आहे असा प्रश्न पंतप्रधानांनी विचारला. गरिबी दूर व्हायला हवी की नाही असा प्रश्न त्यांनी विचारला.
 
या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मोदींनी प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमात त्यांनी अर्थसंकल्पाबाबत भाष्य केलं. गरीब आणि श्रीमंत हे दोन्ही घटक नव्या भारत भूमीचे हात व्हावे असा प्रयत्न राहील असं मोदी म्हणाले.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: सातारा आणि पंढरपूरमध्ये माजी सैनिकांसाठी अत्याधुनिक सुविधा संकुले उभारली जाणार

अत्यंत पौष्टिक आणि जमिनीचा सुपीकपणा वाढवणारे पीक; वाल लागवड

माजी सैनिकांसाठी सातारा आणि पंढरपूरमध्ये अत्याधुनिक सुविधा उभारल्या जातील-शंभूराज देसाई

विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला, सरकारने गृहमंत्री हटवावेत, राहुल गांधी पत्रकार परिषदेत गरजले

तुकाराम मुंढे यांचा ऐतिहासिक निर्णय; शाळांच्या ५० मीटर परिसरात आता शीतपेये, वडा पाव, बर्गर आणि आईस्क्रीमवर बंदी!

पुढील लेख
Show comments