suvichar

CoronaVirus : सर्व स्पर्धा रद्द, बीसीसीआयचा मोठा निर्णय

रविवार, 15 मार्च 2020 (12:10 IST)
कोरोना विषाणुच्या धसक्याने बीसीसआयने सर्व स्पर्धा रद्द केल्या आहेत. खेळाडू आणि चाहत्यांचा विचार करून आम्ही सर्वच स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेत आहोत, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
 
रणजी करंडक स्पर्धेची शुक्रवारी अंतिम फेरी खेळवण्यात आली. पण आता या स्पर्धेनंतर एकही स्पर्धा न भरवण्याचा विचार बीसीसीआयने केला आहे. त्यामुळे आजपासून बीसीसीआयच्या अंतर्गत कोणत्याही स्थानिक स्पर्धा खेळवण्यात येणार नाहीत. कोरोना व्हायरसमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेबरोबरची मालिका शुक्रवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर आयपीएलही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. तोपर्यंत जर कोरोना व्हायरसचा प्रसार थांबला नाही, तर आयपीएलही रद्द करण्यात येऊ शकते. पण सध्याच्या घडीला इराणी ट्रॉफी आणि विजय हजारे करंडक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

रोहित आणि कोहली यांनी लॉर्ड्सवर इतिहास रचला, ४०० सामने खेळणारी पहिली भारतीय जोडी ठरली

भारत तिसरा एकदिवसीय सामना २७ धावांनी हरला, इंग्लंडने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली

अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर

श्रीलंका दौऱ्यासाठी पाकिस्तान महिला संघ जाहीर, संघातून ८ खेळाडूंना वगळले

वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू खेळाडू सर गार्फिल्ड सोबर्स यांचे निधन

पुढील लेख
Show comments