Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंडर -19 विश्वचषक : भारत उपान्त्य फेरीत

Updated: बुधवार, 29 जानेवारी 2020 (12:14 IST)
 
भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या आव्हानातील हवाच निघून गेली. ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या 159 धावांत गारद झाला. भारताचा जलदगतीचा गोलंदाज कार्तिक त्यागी हा सामनावीराचा मानकरी ठरला. त्याने 24 धावांत 4 बळी टिपले. 
 
उपान्त्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. भारताच्या डावाची सुरुवात फारशी समाधानकारक झाली नाही. सलामीचा फलंदाज दिव्यांश सक्सेना 14 धावांवर तंबूत परतला. त्यावेळी भारताची धावसंख्या 35 होती. त्यानंतर ठरावीक अंतराने फलंदाज बाद होत गेल्याने भारतीय संघासमोरील अडचणीत वाढ झाली. सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वाल याने एका बाजूने किल्ला लढवण्यचा प्रयत्न केला. त्याने सर्वाधिक 62 धावांची खेळी साकारली. जयस्वाल बाद झाल्यानंतर टीम इंडियासंकटात असताना सिद्धेश वीर आणि अथर्व अंकोलेकर यांनी डावाची धुरा हाती घेतली. सिद्धेश 25 धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेल्या रवी बिष्णोईने 30 धावांची खेळी साकारत अथर्वला चांगली साथ दिली. अथर्वने 54 चेंडूत 55 धावांची नाबाद खेळी करत टीम इंडियाची धावसंख्या 233 पर्यंत पोहोचवली.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात उतरणार, सामना सकाळी किती वाजता सुरू होणार?

९३ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी झाली, मानव सुथारने इतिहास रचला; एका विशेष क्लबमध्ये स्थान मिळवले

बीसीसीआयने दलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचे ठिकाण बदलले, विजेतेपदाचा सामना बंगळूरुऐवजी चेन्नईत होणार

भारताने श्रीलंकेला १६५ धावांनी हरवले, ६०० वा कसोटी सामना जिंकला

देवदत्त पडिक्कलने गॉल कसोटीत एक मोठी कामगिरी केली, तिसरा भारतीय खेळाडू ठरला

पुढील लेख
Show comments