Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ज्ञान प्रबोधिनी.....नेतृत्व विकसन स्थापित संस्था........

Updated: गुरूवार, 12 मार्च 2020 (18:02 IST)
प्रकल्प देखील असतात जसं भविष्यवेध प्रकल्प, विशेष उद्दिष्टय गट .
 
*संत्रिका -
संस्कृत आणि संस्कृतीचा शोध घेणारी(संशोधिका) "संत्रिका " ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा महत्वाचा विभाग आहे. कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांचा मार्गदर्शनाखाली 22 जुलै 1975 रोजी या विभागाची स्थापना झाली.या विभागात एक 
ग्रंथालय आहे ज्याचा मध्ये तब्बल 13000 ग्रंथ आहे.
 ज्या मध्ये संस्कृत पुस्तके,हस्तलिखिते कोश,संदर्भ कोश, रामायण संग्रह,व अन्य ग्रंथ आहे. रामायण संग्रहात 1957 पुस्तके 33 भाषेत आणि 18 विविध लिपीं मध्ये आहे. 23 भारतीय भाषा आणि 10 परदेशी भाषेत आहे. या 
विभागात ज्ञान प्रबोधिनी पद्धत्तीने संस्कार करणारे 40 पेक्षा जास्त पुरोहित कार्यरत आहे. हे पुरोहित संपूर्ण भारतभरात प्रबोधिनी पद्धतीने विविध संस्कार आणि शांती करतात.पौरोहित्याचे यामध्ये मोठे योगदान 
आहे.सार्थता,सामूहिकता,शिस्त आणि समभाव या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. सर्व जाती पंथाच्या लोकांसाठी पौरोहित्याचे वर्ग संत्रिकेत सन 1992 पासून घेतले जात आहे. स्वयं पौरोहित्य शिकवणे या मागचा हेतू आहे.
 
*उद्योजकता विभाग -
या विभागात साहस सहली,विज्ञानदले,तंबू शिबिरे,अभ्यास शिबिरे,विक्री उपक्रम, गणेशोत्सव पालखी विस्तार शिबिरे क्रीडा प्रात्यक्षिके,अभ्यास दौरे घेतले जाते .जेणेकरून या माध्यमांतून 
 महाविद्यालयातील युवक- युवती संघटन व नेतृत्व विकसन होते.
   
* स्त्री शक्ती प्रबोधन (ग्रामीण) -
भोर,वेल्हे,आणि हवेली या पुण्याजवळतील तीन तालुक्यांत ग्रामीण महिलेंसाठी काम केले जाते. पुणे जिल्ह्यातील शिवगंगा- गुंजवणी खोऱ्यात ग्रामीण शक्तीचे संघटन दारूबंदी आंदोलनाद्वारे सुरु झाले.या मध्ये महिलांसाठीचे बचतगट सुरु झाले. हे बचत गट 1995 साली सुरु झाले असून तब्ब्ल 300 गटाचे काम 45 गावात चालत असतात  जवळपास या गटांमध्ये  5200  महिला सभासद आहे. गटाची वार्षिक उलाढाल 2 .५ रुपयांची आहे. या गटांच्या माध्यमातून महिलांना उद्योजकता विकास,आरोग्य व ग्रामीण नेतृत्वाचे,किशोरी विकास,युवती विकास,हिरकणी महिला प्रशिक्षण दिले जाते. दुर्गम भागात  मुलींसाठीचे वसती गृह चालवले जाते.पुण्यातील भोर तालुक्यातील खोपी गावात देशव्यापी चाललेल्या बँक इन्क्लुजन कार्यक्रमांतर्गत 100 % बँक खाती काढून हे गाव महाराष्ट्रात प्रथम आले आहे. या बचतगटाचा उद्देश्य ग्रामीण महिला साक्षर होऊन स्वावलंबी व्हायला हवे. असा आहे.  
शब्द ते शक्ती प्रकल्प -
या प्रकल्पांतर्गत किशोरी युवती,महिलांसाठी व्यक्तिमत्व विकसन,आरोग्य स्वयंरोजगार,नेतृत्व प्रशिक्षण दिले जाते.
ग्रामीण माता व बालकेंसाठी आरोग्य प्रकल्प आणि आरोग्य प्रबोधिका प्रशिक्षण दिले जाते.त्याच बरोबर अंगणवाडीताईची गुणवत्ता वाढीसाठीचे प्रशिक्षण दिले जाते.
ग्रामविकसन विभाग हा पण ज्ञानप्रबोधिनीचा महत्वाचा भाग आहे.
 
* स्त्री शक्ती प्रबोधन (शहरी) : संवादिनी -
हा गट पदवीधारी गृहिणी चालवतात. सन 2000 साली पुण्यात या गटाची स्थापना झाली. याचा हेतू "व्यक्तिविकासातून सामाजिक विकास करणे" अर्थात स्वतःचा व्यक्तिविकास करतांना समाजासाठी काहीतरी करणारा हा गट महिलांचाच आहे. मासिक बैठक घेऊन कामाचा आणि सभासदांच्या विषयांच्या प्रशिक्षणाचा आढावा घेतला जातो.आवडीच्या गटात काम करायला मिळेल या प्रेरणेने  महिला गटात येतात.
 
* स्पर्धा परीक्षा केंद्र - 
शासकीय नौकरीसाठी ज्या कुठल्या परीक्षा द्याव्या लागतात त्यांची तयारी या विभागात केली जाते.उत्तम अधिकारी निर्माण होण्यासाठीचे प्रशिक्षण इथे दिलेले जाते.
 
* छात्र प्रबोधन -
किशोरवयीन मुलांना वाचण्याची आवड लागावी त्यासाठी संस्थेने 1992 साला पासून छात्र प्रबोधन मासिक काढले आहे. त्यांना साहित्याचा सकस आहार मिळावा. या साथीचे मासिके उपलब्ध असतात. वाचकांचा कृतीशील सहभागासाठी संपादक मंडळ जागरूक आहे. अंकाची सुलभ आवृत्ती,इंग्रजी आवृत्ती,युवांसाठी "युवोन्मेष" अंक काढतात.
 
* नागर वस्ती विभाग -
 जवळ पास पुण्याच्या 30 वस्त्यांचा अभ्यास करून ज्ञान प्रबोधिनीने नागर वस्ती विकासासाठी कार्य सुरू केले आहे . त्यात किशोर विकास, महिला विकास, किशोरी विकासाठी स्वतंत्र उपक्रम घेतले जातात.
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नागपूरमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ, महानगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला!

एअर इंडियाची मोठी घोषणा, मुंबई-टोरोंटो थेट विमानसेवा २५ ऑक्टोबरपासून सुरू होणार

LIVE: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र , राष्ट्रवादी काँग्रेसने दिले प्रत्युत्तर

सीएसएमटी आणि सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित रेल्वेगाडी धावणार

पुढील लेख
Show comments