Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वर्क फ्रॉम होम

Updated: गुरूवार, 19 मार्च 2020 (17:12 IST)
 
त्यावर ती म्हणाली, मग मीही वर्क फ्रॉम होम करते. यावर सगळेच हसायला लागले. तिला कळेना तिचं काय चुकलं. त्यावर मुलगा म्हणाला, 'आई, तुझं रोजच वर्क फ्रॉम होम असतं.' तिच्या डोळ्यात पाणी आलं. कोणाला काही कळू नये म्हणून ती किचनमध्ये जाऊन मनाशीच बोलू लागली. कोरोना येवो, रविवार असो, बँक हॉलिडे असो की कुठला सण असो की महिला दिन. मी रोजच घरची कामं करते. मला कधी सुट्टी असते का. किती विचार करणसारखी गोष्ट आहे ना ही? आई कुठे काय करते?
 
घरच्या स्त्रीला कायमच गृहीत धरतो ना. कसंबसं सावरत म्हणाली, 'तुम्ही घरी आहात तर दोन दिवस माहेरी जाऊ का?' त्यावर मुलगी म्हणाली, ' मग कुकिंग कोण करणार?' ती म्हणाली, 'तुला शिकवलं की कुकर लावायला. भाजी करायला. पोळ्या घेऊन या बाहेरुन.' त्यावर तिचा पुढचा प्रश्र्न तयार. 'मावशी पण येत नाहीत ग भांडी कोण घासेल माझी नखं तुटतात.' तिची नखं नसतील काहो तुटत. तिला नसेल का नेलपेंट लावावं वाटत. म्हणाली, 'तू कर रे ताईला मदत.' तर बाबा म्हणतो कसा, 'मुलगा आहे तो. त्याला कुठे भांडी घासायला लावतेस.' 
 
तीही म्हणाली, 'ठीक आहे. मी कुठेही जात नाही. कोरोना प्रकरण संपलं की मी नोकरी करेन. मलाही मझ्या पायावर उभं राहायचं.' त्यावर मुलगी म्हणाली, 'आई, तुला का करायचीय नोकरी, आम्ही देतो की पैसे.' त्यावर धीर करुन ती म्हणाली, 'मला पैसे नकोत तर माझा गहाण टाकलेला स्वाभिमान हवा. तो कुठे तुमच्या पैशात येणारे. कोरोनाचे आभार. कारण त्याने माझे डोळे उघडलेत...!'
सोनल गोडबोले

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

उत्तम पीक येण्यासाठी आणि चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतीची महत्त्वाची कामे

LIVE: जीशान सिद्दीकीला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या

रेल्वे प्रवास पूर्ण झाल्यावरही तिकिटाचा परतावा मिळू शकतो; पण हा लाभ कोणाला मिळतो?

तरुण तेजपाल यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका १५ ऑगस्टपासून सुरू होणार; ७ ऑगस्ट रोजी तीन दिवसांचा सराव सामना

पुढील लेख
Show comments