Dharma Sangrah

Sane Guruji Suvichar In Marathi साने गुरुजी यांचे विचार

शुक्रवार, 11 जून 2021 (09:29 IST)
आईचे प्रेम जिथे असेल
ती झोपडी राज राजेश्वरीच्या ऐश्वर्या लाही लाजवील,
हे प्रेम जिथे नाही ते महाल व दिवाणखाने
म्हणजे स्मशानेच होत.
 
आजकाल जगात भलत्याच गोष्टींना महत्त्व आले आहेत,
वास्तविक ज्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे
त्यांना कोणीच देत नाही,
मुख्य महत्त्व माणुसकीला आहे.
 
आपले मन म्हणजे एक महान जादुगार व चित्रकार आहे,
मन म्हणजे ब्रह्म सृष्टीचे तत्त्व आहे.
 
एका ध्येयाने बांधलेले कोठेही गेले
तरी ते जवळच असतात.
 
करी मनोरंजन जो मुलांचे,
जडेल नाते प्रभूशी तयाचे.
 
कला म्हणजे परमोच्च ऐक्य.
कला म्हणजे सत्य,
शिव आणि सौंदर्य यांचे संमेलन.
 
कीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे,
पण पैसा हि आजची भाकर आहे.
 
जगात कोणीही संपूर्ण स्वतंत्रपणे सर्व
ज्ञान शोधून काढले आहे असे नाही.
 
जिकडून जे घेता येईल,
ज्यांच्यापासून जे शिकाता येईल
ते आदराने घ्या.
 
जुन्या जीर्ण शीर्ण रूढी आज कशा चालतील?
लहानपणीचा अंगरखा मोठेपणी मुलाला कसा होईल?
 
जे सत्य असते ते काळाच्या ओघात टिकते,
असत्य असते ते अदृश्य होते.
 
ज्ञान म्हणजे ध्येयासाठी शून्य होणे, ज्ञान म्हणजे चर्चा नव्हे,
वादही नव्हे आणि देह कुरवाळणे म्हणजे ज्ञानही नव्हे,
ध्येयासाठी देह हसून फेकणे म्हणजे ज्ञान.
 
ज्यांच्या भावना कशानेही हेलावत नाहीत,
ती काय माणसे म्हणायची.
 
दुसऱ्याला हसणे फार सोपे असते
पण दुसऱ्या करिता रडणे
फार कठीण असते,
त्याला अंत:करण असावे लागते.
 
निर्बालांना रक्षण देणे
हीच बाळाची खरी सफलता होय.
 
भूतकाळातील काही गोष्टी आता
चुकीच्या वाटल्या तर
त्या दूर न करणे म्हणजे
भूतकाळाचा अपमान आहे. भूतकाळातील भ्रामक गोष्टी
जर तशाच पुढे चालवू तर ते उचित नाही.
तो भूतकाळाचा गौरव नाही.
तो पूर्वजांचा गौरव नाही.
उलट त्या थोर पूर्वजांचा अपमान करण्यासारखे आहे.
 
ध्येय सदैव
वाढतच असते.
 
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दु:ख असते
दु:ख गिळून आनंदी राहणे हीच खरी माणुसकी.
 
निसर्गावर प्रेम करा,
निसर्ग आपली माता आहे.
 
मेघ सारे पाणी देवून टाकतात,
झाडे फळे देवून टाकतात,
फुले सुगंध देवून टाकतात,
नद्या ओलावा देवून टाकतात,
सुर्य चंद्र प्रकाश देतात
जे जे आहे ते ते सर्वांनी मिळून उपभोग घेऊ.
 
हृदयात अपार सेवा भरली कि
सर्व मित्रच दिसतात.
 
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे,
स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी.
 
सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे
बर्फाच्या राशी वितळतात,
त्याप्रमाणे अहंकाराच्या
राशी प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात.
 
मोतांच्या हारापेक्षा
घामाच्या धरांनीच मनुष्य शोभतो.
 
प्रेमाचे नाते
सर्वात थोर आहे.
 
सदाचार हा मनुष्याचा
खरा अलंकार आहे.
 
सुधारणा करण्याचे
अनेक मार्ग असतात.
 
भेदावर अभेद
हेच औषध आहे.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

पद्मश्री मालती जोशी यांच्या स्मरणार्थ आयोजित 'स्मृती कल्प' कार्यक्रमांतर्गत साहित्य आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवर इंदूरमध्ये एकत्र येणार

भानू सप्तमीच्या शुभ पर्वावर सूर्यदेवाला अर्पण करण्यासाठी अत्यंत सोपा, झटपट होणारा पारंपारिक नैवेद्य

चहामध्ये टोस्ट बुडवून खाता? आधी जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक तोटे

12वी नंतर DCA करा आणि IT क्षेत्रात मिळवा शानदार करिअरची संधी

उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेवरअर्धा बटाटा आणि अर्धे केळे उपयोगी आहे

पुढील लेख
Show comments