Marathi Biodata Maker

Avoid Sprouts पावसाळ्यात मोड आलेली कडधान्य सेवन करणे टाळा

सोमवार, 11 जुलै 2022 (06:59 IST)
तसं तर अंकुरलेले किंवा मोड आलेले कडधान्य आरोग्यास खूप फायदेशीर आहे आणि हे आपल्या आहारात नियमित रुपात समाविष्ट केल्याने आपल्या आरोग्य आणि सौंदर्याचे बरेच फायदे मिळू शकतात. परंतु प्रत्येक निरोगी वस्तू प्रत्येक वेळी एकसारखे परिणाम देईल असे काही जरुरी नाही. होय, अंकुरलेले किंवा मोड आलेले कडधान्य किती ही फायदेशीर असले तरी पावसाळ्यात हे खाणे आपल्यासाठी हानिकारक होऊ शकते.
 
आता आपण विचारात पडला असाल की मोड आणलेले किंवा अंकुरलेले कडधान्य आरोग्यास कसे काय हानिकारक आहे ..तर आम्ही आपणास त्याचे कारण सांगत आहोत.
 
वास्तविक मेघसरींमध्ये अन्नातून विषबाधा आणि पोट बिघाड होण्याचे त्रास सर्वात जास्त होतात. यामागील सर्वात मोठे कारण पाणी किंवा इतर पदार्थांमध्ये असलेले जिवाणूंमुळे होणारे संसर्ग, जे आपल्या पोटालाच खराब करत नाही तर उलट्या आणि अतिसार सारख्या समस्यांना देखील जन्म देऊन आपल्या साठी धोकादायक ठरू शकतात.
 
आहारतज्ज्ञ या हंगाम्याच्या काळात अंकुरलेले कडधान्य न खाण्याचा सल्ला देतात, याचे पहिले कारण असे की हे बऱ्याच काळ पाण्यात भिजवलेले असतात आणि त्यापेक्षा या मध्ये जास्त काळ ओलावा टिकून राहतो अशामुळे त्यामध्ये धोकादायक जिवाणू होण्याचा धोका आणखीनच वाढतो.
 
दुसरे कारण असे की या मध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. जे पोट स्वच्छ करण्यास मदत करतात. अश्या परिस्थितीत, अतिसार सारखी समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे शरीरात पाणी आणि पोषकतत्वांची कमतरता होऊ शकते.
 
तथापि, जर आपणास या हंग्यामात अंकुरलेले कडधान्य खावयाचे असल्यास, आपण याला चांगल्या प्रकारे उकळवावे आणि ताजे असताना वापरावे, जेणे करून या मुळे आपणांस काहीही त्रास होऊ नये.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

Maharana Pratap Jayanti 2026 Speech महाराणा प्रताप यांच्यावर भाषण

फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेचा वापर किती दिवस सुरक्षित? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Mango Malpua Recipe मालपुआला द्या आंब्याचा ट्विस्ट; एक अप्रतिम चव

रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या

AIIMS Vacancy : एम्स सीआरई-५ भरती दहावी उत्तीर्ण ते पदव्युत्तर पदवीधर अर्ज करू शकतात

पुढील लेख