Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिरतारुण्य ‍टिकवण्यासाठी काही सोपे उपाय

Updated: शनिवार, 18 एप्रिल 2020 (13:03 IST)
 
* व्हिटॅमिन डी घेणे - व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतं आणि व्हिटॅमिन डी आपल्याला सूर्याच्या किरणांपासून मिळते. जमल्यास सकाळी कोवळ्या उन्हात बसावे त्या पासून आपल्याला व्हिटॅमिन मिळते. दररोज असे करणे शक्य नसल्यास जमेल तेव्हा करावे. असे केल्याने शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता होणार नाही.
 
* मसाज करावे - शरीरामध्ये रक्त विसरण चांगले होण्यासाठी आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा तरी स्पा किंवा मसाज करावी असे केल्यास रक्त विसरण चांगले होईल आणि तणाव कमी होण्यास मदत मिळेल.
 
* दीर्घ श्वासोच्छ्वास घेणे - दर रोज सकाळी प्राणायाम करावे जेणे करून आपले फुफ्फुस चांगल्यारीत्या कार्य करतील ताण दूर होईल. श्वसन तंत्र चांगले काम करतील. हृदय स्वस्थ राहील.
 
* मेडिटेशन करणे - मेडिटेशन करून आपण आपल्या शरीरास तेजवान आणि निरोगी ठेऊ शकतो. मेडिटेशन कामाच्या ताणाला कमी करते.
 
* प्रथिनं आहारात घ्यावे  - नियमाने व्यायाम करत असल्यास आपल्या आहाराकडे लक्ष द्या. जेवणात प्रथिनांचा समावेश करा. दूध, बदाम, चणे खावे. व्यायामानंतर चणे खावे. ह्यात भरपूर प्रमाणात प्रथिन असतात. जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे.
 
* डोळ्यांना विश्रांती द्या - आजचे युग कॉम्पुटरचे आहे. दिवस रात्र कॉम्पुटर आणि लॅपटॉप वरूनच सर्व काम केले जातात. त्यामुळे कॉम्प्युटर स्क्रीन पासून निघणाऱ्या किरणांमुळे डोळ्याला इजा होऊ शकते. त्यासाठी डोळ्यांना आराम द्या 2 -3 मिनिटे डोळे बंद करून बसा. असे केल्यास डोळ्याचा ताण कमी होईल. अधून मधून आपले डोळे थंड पाण्याने धुवा.

* धावणे- आजच्या धावपळीच्या जगात जो बघा तो धावत आहे. पण हे असं धावणे शरीरांवर वेगळाच प्रभाव टाकते. काही लोक आपल्या शरीराला फिट ठेवण्यासाठी व्यायाम करतात, जॉगिंगला जातात. पण काही कारणास्तव वेळ मिळत नसल्यास जेव्हा वेळ मिळेल स्वतःच्या जागेवरच धावावे. धावल्याने रक्त विसरण चांगले होते आणि शरीर निरोगी राहत. वेळोवेळी आपल्या चिकित्सकांचे योग्य तसे मार्गदर्शन घ्या. स्वस्थ राहा मस्त राहा.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पावसाळ्यात कोणत्या जीन्स वापराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात? वाचा

पावसाळ्यात गोड आणि रसरशीत नासपती फळ खरेदी करताना या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा

Shravan special vegetables श्रावणात कांदा लसूण न वापरता या भाज्यांचा आस्वाद घ्या!

पावसाळ्यात फरशी पुसतांना पाण्यात हे नैसर्गिक घटक मिसळा; कीटक निघून जातील

Analogue Paneer ॲनालॉग पनीर म्हणजे काय? शरीरासाठी किती हानिकारक?

पुढील लेख
Show comments