Marathi Biodata Maker

अधिक वेळा दूध उकळवत असाल तर सावध व्हा

आपण हे ऐकले असेल की दुधाला उकळून प्यायला हवं, ज्याने त्यातील सूक्ष्म जिवाणू नष्ट होऊन जातात. दूध उकळून पिणे योग्य आहे पण दूध वारंवार उकळून पिणे हानिकारक होऊ शकतं.
 
हो हे खरं आहे, दुधाने पोषण प्राप्त करण्यासाठी आपण दूध उकळून पित असला तरी एका शोधात हे स्पष्ट झाले आहे की वारंवार दूध उकळल्याने त्यातील पोषक तत्त्व नष्ट होऊन जातात. असे केल्याने आपल्याला दुधाचे ते पोषक तत्त्व प्राप्त होणे शक्य नाही ज्यासाठी आपण दुधाचे सेवन करता.
 
पोषणच्या या नुकसानापासून वाचण्यासाठी, दूध वारंवार उकळू नये. दूध उकळताना ते 3 मिनिटांपेक्षा अधिक वेळेपर्यंत उकळू नये. आचेवर दूध असताना चमच्याने हालवत राहा.
 
रिसर्चप्रमाणे, 17 टक्के स्त्रियांना हे माहीत नसतं की वारंवार दूध उकळल्याने त्यातील पोषक तत्त्व नष्ट होतात. तसेच 59 टक्के स्त्रियांना वाटतं की दूध उकळल्याने त्यातील पोषक तत्त्वांची वृद्धी होते आणि 24 टक्के स्त्रियांना वाटतं की दूध उकळल्याने काही फरक पडत नसतो.
 
तर आता दूध केवळ एकदा उकळावे आणि आपल्या मुलांना पूर्ण पोषण प्राप्त करू द्यावे. आपलं समजूतदारपणा मुलांच्या जीवनासाठी फायदेशीर सिद्ध होईल आपल्या आरोग्याच्या दृष्टीने याचे चांगले परिणाम प्राप्त होतील.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

वय ४० उलटलेल्या पुरुषांनो सावधान! प्रोस्टेट कॅन्सरचा धोका का वाढतोय? ही ५ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नका

भानू सप्तमी दिवशी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी पारंपरिक आणि सात्त्विक नैवेद्य पाककृती

सोप्या घरगुती टिप्स: घरात कीटक नियंत्रण (Pest Control) कसे करावे ?

शिवराज्याभिषेक दिन भाषण Shivrajyabhishek Sohala Speech 2026

Shivrajyabhishek 2026 Images शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोशल मीडियावर शेअर करा शुभेच्छा Photos

पुढील लेख
Show comments