Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवतपा: या 9 दिवसात काय खावे काय नाही जाणून घ्या

Updated: मंगळवार, 26 मे 2020 (22:20 IST)
 
1 उन्हाळ्यात येणाऱ्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असतात. त्यासाठी फळे भरपूर खावे.
 
2 कलिंगड, खरबूज, काकडी हे नियमाने खाल्ल्याने शरीरात पाण्याबरोबरच खनिज लवणांची कमतरता दूर होते.
 
3 या दिवसात वरण, भात, भाजी, पोळी खाणे चांगले राहते. उन्हाळ्यात भुकेपेक्षा कमीच खाणे चांगले असतं. जेणे करून आपल्या अन्नाचे पचन पण व्यवस्थित होईल आणि शरीर टवटवीत राहील. तळलेल्या वस्तू जास्त प्रमाणात खाऊ नये. अन्यथा आपल्या पचनास बिघाड होऊ शकतो.
 
4 नवतपाच्या कडक उन्हाळ्यात शरीरातील पाणी घामाच्या रूपाने निघून जातं त्यासाठी दिवसातून किमान 4 लीटर पाणी प्यायला हवं.
 
5 या दिवसांत प्रचंड उन्हाळ्यात नारळ पाणी, ताक, लस्सी, प्यायल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यास मदत मिळते. उन्हाळ्यात तळलेले आणि चमचमीत पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होत असते. पण या दिवसात हे खाणे टाळल्यास चांगलंच आहे. 
 
6 जेवणात जास्त मीठ घेऊ नये. फरसाण, शेंगदाणे, तळलेले पापड, चिप्स आणि तळलेले खाद्य पदार्थ घेऊ नये.
 
7 नवतपाच्या प्रचंड उष्णतेमध्ये मासे, कोंबडी, सी फूड, आणि जास्त गरिष्ठ पदार्थांचे सेवन करणे टाळावे. यामुळे जास्त घाम येतो आणि पचनाच्या तक्रारी उद्भवतात.
 
8 नवतपामध्ये जंक फूड जसे पिझ्झा, बर्गर खाणे टाळावे.
 
9 चहा आणि कॉफी सारख्या पेय टाळणेच सोयीस्कर आहे. कॅफिन आणि इतर पेय आपल्या शरीराच्या उष्णतेला वाढवते. त्याच बरोबर शरीरात निर्जलीकरण म्हणजे पाण्याची कमतरता वाढवते.
 
10 या दिवसांत सॉस खाणे टाळावं. सॉस मध्ये 350 कॅलोरी आढळते जेणे करून आपल्यामध्ये आळशीपणा येऊ शकतो. काही प्रकारांच्या सॉस मध्ये मीठ आणि MSG (मोनोसोडियम ग्लुटामेंट) आढळतं, जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं. त्या ऐवजी उन्हाळ्यात पौष्टिक आणि नैसर्गिक अन्नासह ताक, लस्सी, लिंबू-पाणी, शिकंजी, आणि आंब्याचे पन्हे या सारख्या द्रवांचे सेवन करायला हवं.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

रक्षाबंधन खास प्रसंगी भावासाठी बनवा पारंपरिक आणि पौष्टिक ''मूग डाळ बर्फी''

सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या मनुकांचे पाणी प्या; आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

BPharma 12 वी नंतर बॅचलर ऑफ फार्मसीमध्ये मध्ये करिअर बनवा, पात्रता, पगार व्याप्ती जाणून घ्या

महागड्या केमिकल हेअर कलर्सना निरोप द्या, हा घरगुती हेअर डाय घरीच बनवा

ओमेगा ३ च्या कमतरतेमुळे शरीरात या ५ समस्या उद्भवू शकतात, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

पुढील लेख
Show comments