suvichar

आली लहर केला कहर: अशक्य जोक

गुरुजी : गण्या सांग बरं प्राचीन भारतात गणित आणि भूमिती किती प्रगत होती??
गण्या : श्रीमद् भगवतगीतेत पार्थ म्हणून ज्या अर्जुनाचा उल्लेख केला, त्या पार्थाचा गौरवर्णीय यवनीपासून झालेला पुत्र म्हणजेच पार्थागोरस(पायथागोरस)..!!
हा पुत्र यवनीच्या पोटी जन्मला असल्याने त्यास सर्वजण विदेशी म्हणून हिणवू लागले.
तेव्हा अर्जुनाचा सहोदर बंधू कुंतीपुत्र कर्ण याने त्यास आश्रय दिला, कारण तोही कुंतीपुत्र असूनही उपेक्षित वर्गातील होता.
"पार्थागोरस, तू आणि मी पांडव असूनही एकाच उपेक्षित वर्गातील आहोत , तुझा नि माझा वर्ग एकच आहे".
कर्णाच्या वाक्याने 'कर्ण' आणि 'वर्ग' हे दोन शब्द, पायथागोरसच्या मनावर लहानपणीच कोरले गेले.
त्यामुळेच कर्णाच्या या कृतीने उपकृत होवून पायथागोरस ने कर्ण हा इतरांपेक्षा मोठा असा सिद्धांत मांडला.
त्यातूनच पुढे कर्ण वर्ग हा इतर दोन भुजांच्या वर्गाबरोबर असतो असे मत मान्य झाले.
त्याच्या या सिद्धान्ताचे विचार वर्तुळ व्यास मुनींनी पूर्णं केल्यामुळे, वर्तुळाचा व्यास हा वर्तुळास दोन समान भागात विभागतो असा गणितीय सिद्धांत पुढे प्रसूत झाला.
कंस हा तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचा मामा. तो गणितात कच्चा होता, देवकीच्या मुलांना मारताना त्याचे गणित चुकले आणि कृष्ण जन्म होऊन त्याचा मृत्यू अटळ बनला.
कृष्णाच्या हातून मोक्ष प्राप्ती होत असताना कंसाने इच्छा प्रकट केली होती की, गणितात माझ्या नावाने काहीतरी असावे म्हणून, कंसाच्या वधानंतर त्याचे स्मरण असावे म्हणून गणितात ( ) कंस वापरतात.
यावरून प्राचीन भारतात गणित आणि भूमिती किती प्रगत होती, हे सिद्ध होते.
 
सगळा वर्ग ICU मध्ये आहेत.

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

'कॉकरोच जनता पार्टी'ला प्रकाश राज यांचा पाठिंबा, ६ जून रोजी आंदोलनात सहभागी होणार

ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि CBFC चे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन

आमिर खानचा 'लगान' त्याच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त पुन्हा प्रदर्शित होत आहे; निर्मात्यांनी एक हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित केला

पावसाळ्यात मित्रांसोबत फिरायला जा; भव्य ऐतिहासिक स्थळी, पांढरेशुभ्र धबधबे आणि किल्ल्यांना कवेत घेणारे काळेभोर ढग...देखणा नजराणा

आमिर खान तिसऱ्यांदा ५ जुलै रोजी गौरी स्प्रॅट शी लग्न करणार

पुढील लेख
Show comments