suvichar

लग्नासाठी मॅच्युरिटी गरजेची!

वेबदुनिया
म्हणतात ना! वर- वधु यांच्या ब्रम्हगाठी ह्या देवा घरीच बांधलेल्या असतात. आपल्या जीवनात अनेक सुख- दु:खाचे टप्पे येतात. त्यातील सगळ्यात महत्त्वांचा टप्पा म्हणचे विवाहाचा होय. प्रत्येकजण एका 'परफेक्ट लाइफ पार्टनर'च्या शोधात असतो. मात्र तो शोधत असताना स्वत:मध्ये व समोरिल व्यक्तीत मॅच्युरिटी असणे फार गरजेची आहे. विवाह झाल्यानंतर काही दिवसातच काडीमोड होण्यामागील ते एक महत्त्वाचे कारण असू शकते.

समाजात पूर्वी मुलगी 18 वर्षाची होण्याआधीच तिचे लग्न लावून द्यायचे. लग्नासाठी ती शाररीक तसेच मानसिक परिपक्व आहे किंवा नाही, असे काहीच पाहिले जात नव्हते. मुलगी ही परकी असते. तिला सासरी जावे लागत असल्याने तिचा शिक्षण काय कामात येईल. अशी त्या काळची समाजात विचारधारणा होती. मात्र आता काळ बदलला आहे. विवाहाला आता कायद्याचे कुंपन घालण्यात आले आहे. मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 विवाहासाठी योग्य असल्याचे ठरवून देण्यात आले आहे. मात्र असे ठरवून देखील घटस्फोटाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे दोघांमध्ये असलेला मॅच्युरिटीचा अभाव होय.

विवाह नि‍श्चित करताना आवड तर महत्त्वाची आहेच. मा‍त्र मुलगा- मुलगीमध्ये किती वर्षांचे अंतर आहे, हे देखील पाहणे आवश्यक आहे. तेव्हाच त्यांच्यात बांधली गेलेली ब्रम्हगाठ अधिक घट्ट होत असते. जर वर आणि वधु यांच्यात प्रमाणापेक्षा जास्त अंतर असेल तर त्यांच्या विचारात दरी निर्माण होते. भविष्यात ही दरी त्यांच्यातील नात्यामधील प्रेमाचा ओलावा कमी करत असते.

भारतीय समाजात विवाहावरून आज गैरसमज आहेत. वर हा जास्त वयाचा असतो मात्र त्याची वधु ही त्याच्या तुलनेत फारची कमी वयाची असते. त्यामुळे त्यांचा संसार रुपी रथ काही दिवसातच डगमगतो व पुढे जाण्याचे नावच घेत नाही. 

' विवाह' ही भारतीय परंपरा व संस्कृतीसाठी एक संस्था असून तो पती पत्नीचा आधार आहे. यात मुलगा व मुलगी हे दोनही महत्त्वपूर्ण घटक असता‍त. कमी वयात विवाह झाला असेल तर त्याचा प्रभाव आपल्या भावी आयुष्यावर पडणार यात शंका नाही.

मुलगा व मुलगी यांच्या वयात पाच ते सहा वर्षांपेक्षा जास्त अंतर नसावे. हे विवाह निश्चित करण्यापूर्वी आई- वडिलांनी तसेच मुला-मुलींने ही पाहणे आवश्यक आहे.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

या 5 सुपरफूड्सचे सेवन करा, कॅन्सरचा धोका कमी करण्यास होईल मदत

Career After 10th: 10वीनंतरचे सर्वोत्तम कोर्सेस आणि करिअर पर्याय जाणून घ्या

त्वचेचा टोन वाढवायचा आहे? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

नैतिक कथा : राजा आणि शिंगरूची गोष्ट

Health benefits of eating ghee सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा शुद्ध तूप खाल्ल्यास काय होते?

पुढील लेख
Show comments