Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मरता केव्हाही येतं, पण जगता आलं पाहिजे

Updated: शुक्रवार, 31 मार्च 2023 (14:30 IST)
 
"आमचं प्रेम आमच्यासाठी होतं; तुमचं प्रेम 'सगळ्या फ्रेन्ड्सचा बॉयफ्रेन्ड आहे, मग माझाही असलाच पाहीजे', म्हणून केलं जातंय. 
 
"आमचे बॉयफ्रेन्ड नव्हते; कारण जो आहे तो फ्रेन्ड असण्याच्या खूप पुढे गेलाय, हे आम्हाला स्पष्ट जाणवायचं. तुमच्यात इन्स्टाग्रामवर अकाउंट असलंच पाहीजे तसा 
 
बॉयफ्रेन्डही असलाच पाहीजे, 
 
"आम्ही गिफ्ट नव्हे तर स्वत:लाच समर्पित करायचो; तुमच्या गळाभेटीतही भेट कितीची आणली असेल याची कैलक्युलेशन्स असतात. 
 
"आम्ही धुंद होतो; तुम्ही उधळलेले आहात. 
 
"आम्ही चेहऱ्यावरचं तेज शोधायचो; तुम्ही शर्टचा ब्रान्ड पाहताय. 
 
"आम्हाला नजरेतली समजदार चमक भाळायची; तुम्हाला गॉगलच्या किमती भुरळ घालतायत. 
 
"आमच्या शरीरांना पेशन्स मंजूर होता; तुमच्या मनालाच तो नकोय."
 
..."बाळा; जमणं - न जमणं हे क्षमतेवर अवलंबून असतं. क्षमता डेव्हलप करायची
 असते..!
 
जगता आलं पाहिजे... मरता केव्हाही येतं, पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृव 
 
उजाळता आलं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील काजळी काढता आली पाहिजे. यशानं माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे. 
 
मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. पापं काय कसही करता येतं, पण पुण्य करता आलं पाहिजे. ताठ काय कोणीही राहतं, पण जरा झुकून 
 
वागता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच, सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला, पुन्हा चालता आलं पाहिजे. शहाण्याचं सोंग घेऊन, वेड होता आलं पाहिजे. 
 
कशाला बळी न पडता, आनंदी जगता आलं पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल, ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूचा मिलाप करून. फक्त 
 
समाधानी राहता आलं पाहिजे... 
आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आले पाहिजेली. 
 
चार वर्षं मज्जेत बॉयफ्रेन्ड असलेल्याचा आठ महिन्यापुर्वी हजबन्ड झाल्यानंतरचा हा राग होता.
 
*"प्रश्न विचारलास, का ?
 
पंचावन्नची आई त्या फोनला पडलेल्या चऱ्यांकडे पाहत शांत आवाजात म्हणाली; 
 
" उत्तर हवंय, का   ?
'हो 
 
"उत्तर हवंय", लेक म्हणाली. 
 
"असे आहे न बाळा," आई सहजच म्हणाली;
 
"आम्ही 'कसं जमवता येईल' ते शोधत होतो; 
तुम्ही 'जमलं तर पाहू' म्हणताय.
 
"आमच्या वेळी प्रेम हे व्हायचं; तुमच्या काळात ते केलं जातं.
 
"आम्ही साथीदार व्हायचो; तुम्ही पार्टनर बनवता. 
 
"आमच्यात प्रेम ही सहजता होती; तुमच्यात तो अट्टहास झालाय.
 
"आमचं प्रेम लहानाचं मोठं व्हायचं; तुमचं प्रेम लहानपणीच घाई करतं. 
 
"आमच्या वेळी मैत्री विश्वासात रुपांतरीत व्हायची; तुम्ही जवळिकीला रिलेशनशिपचा बोर्ड लटकवण्याची घाई करताय.
 
"आम्ही कविता लिहायचो; तुम्ही त्या फॉरवर्ड करताय. 
 
"आमचे जीवनसाथी होते; तुमचे बॉयफ्रेन्ड नि गर्लफ्रेन्ड आहेत.
 
"आमचं प्रेम आमच्यासाठी होतं; तुमचं प्रेम 'सगळ्या फ्रेन्ड्सचा बॉयफ्रेन्ड आहे, मग माझाही असलाच पाहीजे', म्हणून केलं जातंय. 
 
"आमचे बॉयफ्रेन्ड नव्हते; कारण जो आहे तो फ्रेन्ड असण्याच्या खूप पुढे गेलाय, हे आम्हाला स्पष्ट जाणवायचं. तुमच्यात इन्स्टाग्रामवर अकाउंट असलंच पाहीजे तसा 
 
बॉयफ्रेन्डही असलाच पाहीजे, 
 
"आम्ही गिफ्ट नव्हे तर स्वत:लाच समर्पित करायचो; तुमच्या गळाभेटीतही भेट कितीची आणली असेल याची कैलक्युलेशन्स असतात. 
 
"आम्ही धुंद होतो; तुम्ही उधळलेले आहात. 
 
"आम्ही चेहऱ्यावरचं तेज शोधायचो; तुम्ही शर्टचा ब्रान्ड पाहताय. 
 
"आम्हाला नजरेतली समजदार चमक भाळायची; तुम्हाला गॉगलच्या किमती भुरळ घालतायत. 
 
"आमच्या शरीरांना पेशन्स मंजूर होता; तुमच्या मनालाच तो नकोय."
 
..."बाळा; जमणं - न जमणं हे क्षमतेवर अवलंबून असतं. क्षमता डेव्हलप करायची
 असते..!
 
जगता आलं पाहिजे... मरता केव्हाही येतं, पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृव उजाळता आलं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील काजळी काढता आली पाहिजे. यशानं माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे. 
 
मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. पापं काय कसही करता येतं, पण पुण्य करता आलं पाहिजे. ताठ काय कोणीही राहतं, पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच, सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला, पुन्हा चालता आलं पाहिजे. शहाण्याचं सोंग घेऊन, वेड होता आलं पाहिजे. 

कशाला बळी न पडता, आनंदी जगता आलं पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल, ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूचा मिलाप करून. फक्त समाधानी राहता आलं पाहिजे... आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आले पाहिजे...

- सोशल मीडिया साभार

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

उपवासाच्या दिवशी झटपट बनणारी चविष्ट रेसिपी Curd Potatoes

हात-पायांना मुंग्या येण्यामागे कोणती कारणे असू शकतात? जाणून घ्या

NPCC Recruitment :एनपीसीसी लिमिटेडमध्ये व्यवस्थापक पदासह २६ पदांसाठी भरती, पात्रता इतर माहिती जाणून घ्या

मुरुमांचा त्रास कमी करायचा? घरातील या नैसर्गिक साहित्याने तयार करा फेस मास्क

Monsoon Care Tips: मान्सूनमध्ये एसीचा चुकीचा वापर पडू शकतो महागात, योग्य तापमान जाणून घ्या

पुढील लेख
Show comments