Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुमच्यासोबत असं घडतं असेल तर समजा पालटणार नशीब

Updated: गुरूवार, 18 जुलै 2019 (14:43 IST)
 
घराच्या अंगणात तुळस उगवणे. आता आपण स्वत: रोप लावलं असेल तर गोष्ट वेगळी परंतू घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवले तर याला शुभ संकेत समजावं. तसंच अनेकदा प्रयत्न करून देखील तुळस येत नाही किंवा वाळून जाते अशात आपोआप तुळस येणे म्हणजे घरात प्रभू विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे संकेत आहे.
 
तसेच आपोआप दूर्वा उगवणे देखील शुभ संकेत आहे. घरातील बागेमध्ये गणपतीला अर्पित केली जात असलेली दूर्वा उगवल्यास आता आपल्या कोणत्याही कामात अडथळे निर्माण होणार नाही असे समजून घ्यावे. 
 
तसेच नारळ देखील शुभ संकेत देतं. जर घरात एखादे नारळ ठेवलेलं असेल आणि नारळाला आपोआप तडा गेल्यास समजावे की नारळाने घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली आहे. यानंतर आपल्याला कोणत्याही कामात अडथळे निर्माण होणार नाही. सकारात्मकता जाणवेल आणि कामात यश मिळेल.
 
तसेच मध देखील शुभ संकेत देतं. घरात मध ठेवलेलं भांडे फुटून मध पसरल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होतं आहे असे समजावे. याने घरात एखादं मंगळ कार्य होण्याची देखील शक्यता वाढते.
 
तसेच अगदी सामान्य घडणारी गोष्ट म्हणजे पुरुष कपडे घालतात तेव्हा घडते. कपडे घालताना खिशातून नाणे खाली पडणे. कपडे घालताना खिशातून पैसे किंवा नाणे पडणे शुभ संकेत देतात. याने आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत मिळतात. धन लाभ होण्याची शक्यता वाढते. तर आता खिशातून नाणे पडले आनंदी व्हा.

सर्व पहा

Jivati Puja 2026 Wishes in Marathi श्रावण शुक्रवार विशेष जरा जिवंतिका पूजनाच्या शुभेच्छा

Jivati Katha Marathi श्रावण शुक्रवारी नक्की वाचा जिवतीची आणि देवीची ही पवित्र कहाणी

श्रावण शुक्रवार जिवती पूजन विशेष पारंपरिक नैवेद्य पाककृती

श्रावण शुक्रवार जिवती पूजन २०२६: पूजा साहित्य, विधी, नैवेद्य, आरती आणि कथा (संपूर्ण माहिती)

अत्यंत गूढ, निसर्गरम्य आणि पवित्र नैसर्गिक चुनखडीची गुहा; पाताल भुवनेश्वर पिथौरागढ उत्तराखंड

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments