Marathi Biodata Maker

'फूट पाडा, हिंसा घडवा'चा अजेंडा

Updated: सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 (15:42 IST)
 
शवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील मुंबई कलेक्टिव्ह' कार्यक्रमाच्या समारोपाच्या भाषणात येचुरी यांनी हे आवाहन केले. सीएए, एनआरसी आणि एनआरपीवरून देशाचे वातावरण तापलेले आहे. सीएएवर बोलले तरी तुम्हाला देशद्रोही ठरवले जात आहे. 
 
तुम्ही पाकिस्तानची भाषा बोलत आहात, असा ठपका मारला जात आहे. एनआरसीवरून महात्मा गांधींच्या नावाने चुकीची माहिती पसरवली जात आहे. दिल्लीच्या शाहीन बागेत दहा हजार लोकांचे आंदोलन सुरू आहे. 
 
या आंदोलनात सर्वस्तरातून लोक आले आहेत. देशातील सर्वच विद्यापीठातील विद्यार्थी रस्त्यावर उतरून लढत आहेत. का? तर देशातील लोकशाही धोक्यात आली असून या लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी तरुण रस्त्यावर उतरले आहेत, असे येचुरी म्हणाले. प्रत्येक धर्माचा एक पवित्र धर्मग्रंथ  असतो. काही धर्माचे दोन पवित्र धर्मग्रंथ आहेत. पण आपल्या भारताचा एकच पवित्र ग्रंथ असून संविधान हाच आपला सर्वोत्तम ग्रंथ आहे, असे त्यांनी सांगितले. मी मागे हैदराबादमध्ये गेलो होतो. तिथे हैदराबादी  बिर्याणी मागितली. मला कांद्याशिवाय बिर्याणी दिली. तेव्हा मी वेटरला त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला बिर्याणीपेक्षा कांदा महाग आहे. सध्या देशाची ही अवस्था आहे. देशात गेल्या 50 वर्षांतील सर्वात मोठी बेरोजगारी निर्माण झाली आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. कारखाने बंद होत आहेत. मात्र सरकारला त्याचं काहीही पडलेलं नाही. कालच बजेटमध्ये त्याबद्दल काहीही ठोस देण्यात आलेले नाही. एवढे मोठे लांबलचक भाषण अर्थंमंत्र्यांनी केले. पण पैसा कसा येणार? गुंतवणूक कशी करणार? रोजगार निर्मिती कशी होणार? यावर त्यात अवाक्षरही काढण्यात आलेले नसल्याची टीकाही त्यांनी केली.
 
हिंदूंचा 'ह' आणि मुस्लिमांचा 'म' जेव्हा एकत्र येतो तेव्हा 'हम' तयार होतो. मात्र सध्या देशात या 'हम'वरच हल्ला करण्याचे काम सुरू आहे. 'हम'मध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र सुरू आहे, असे सांगतानाच आम्ही कुणालाही भडकावत नाही. आम्ही तरुणांच्या पाठोपाठ जात आहोत. आजचे तरुण हे आधुनिक शिपाई आहेत. भारताचे भविष्य आहेत. देशातील द्वेष आणि फूट पाडण्याच्या राजकारणाला मूठमाती देण्याची  जबाबदारी या तरुणांवर आहे. त्यामुळे अखंड भारतासाठी तरुणांनो, एकत्र या, असे आवाहनही त्यांनी केले.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments