Festival Posters

शत जन्म घेऊनही शरद पवारांना समजणे फडणवीसांना शक्य नाही, संजय राऊतांची टीका

रविवार, 8 सप्टेंबर 2024 (17:40 IST)
शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदासाठी तीन ते चार नावांची यादी तयार केले असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला होता. त्यावर शिवसेना उबाठाचेनेते संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. 

ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मनात काय चालले आहे ते देवेबद्र फडणवीसांना शंभर वर्षात देखील समजू शकणार नाही, अशी टीका नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी रविवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली .

पत्रकारांशी बोलताना शिवसेना (UBT) नेते म्हणाले, शरद पवार काय विचार आणि नियोजन करत होते हे फडणवीसांना 2019 मध्ये माहीत होते का? त्यांनी शंभर वेळा जन्म घेतला तरी शरद पवारांच्या मनात काय चालले असेल याची कल्पनाही करता येत नाही. राज्य सरकारमध्ये थोडी हिंमत असेल तर त्यांनी निवडणुकीची तारीख जाहीर करावी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडे केवळ राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांमध्येच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातही फूट पाडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

अजित पवारांनी नुकतेच वक्तव्य केले की, कुटुंबात तढी निर्माण करणे समाजाला आवडत नाही त्यावर संजय राऊतांनी म्हटले,  महाराष्ट्रात राजकीय पक्ष आणि घराणे कोणी तोडले? मोदी आणि शहा यांनी राजकीय पक्ष आणि कुटुंबांमध्ये फूट निर्माण केली. यात एकनाथ शिंदे व अजित पवार बळी ठरले. त्यांना पक्ष सोडण्यासाठी धमक्या दिल्या गेल्या, दबाव आणला गेला किंवा आमिष दाखवले गेले हे त्यांनी मान्य करावे.अशी घणाघात टीका संजय राऊतांनी केली.
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

उद्धव यांनी रोज रामरक्षा वाचायला हवी… मुख्यमंत्री फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला प्रत्युत्तर

बच्चू कडू यांनी राज्य सरकार कडे राजुरा पुनर्वसन आणि वासनी सिंचन प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला

भारतातील ४५% घरे इलेक्ट्रिक कार चार्जिंगसाठी सुरक्षित नाही

LIVE: वर्ध्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार, २१ जनावरांचा मृत्यू

मुंबई विमानतळावर ६ कोटी रुपयांचे सोने जप्त, महिला प्रवाशाला अटक

पुढील लेख
Show comments