आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी आघाडीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. आमची मागणी चार जागेची होती त्यासाठी आम्ही आजही आग्रह आहोत. तीन जागा या आमच्या आहेत चौथ्या जागी आमचे संख्याबळ जास्त आहे. संध्याकाळपर्यंत याबाबत निर्णय घेतला जाईल आणि त्यापद्धतीने अधिकृत घोषणाही केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. भाजप - सेनेचा पराभव कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. लातूर-उस्मानाबाद-बीड येथे राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त आहे. एक एक जागा निवडून आणणे सध्या गरजेचे आहे. त्यासाठी दोन्ही काँग्रेसने प्रयत्न करायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.