Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Exit Poll 2021 : भाजप, तृणमूल काँग्रेस की काँग्रेस कोण ठरणार वरचढ

Updated: गुरूवार, 29 एप्रिल 2021 (19:08 IST)
 
पुदुच्चेरीमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र काही दिवसांपूर्वीच तिथलं सरकार कोसळलं.
 
पण पश्चिम बंगालमधली लढत ही सगळ्यात लक्षवेधी ठरण्याचा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.
 
भाजपने या राज्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेससमोर मोठं आव्हान उभं केलंय. तृणमूलचे अनेक नेतेही पक्ष बदलत भाजपमध्ये दाखल झाल्याने सत्ताधारी पक्षासमोरची आव्हानं वाढली आहेत.
 
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या छायेखाली झालेल्या प्रचारसभा, आपल्यावर हल्ला झाल्याचा ममता बॅनर्जींनी केलेला दावा आणि नरेंद्र मोदींनी ममतांना प्रचारसभेमध्ये 'दीदी ओ दीदी' म्हणण्यावरून झालेला वाद, यामुळे ही निवडणूक गाजली.
 
निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना निवडणूक आयोगाने कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेत पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभा आणि रॅलीजवर बंदी घातली होती.
 
तामिळनाडूमध्ये सत्ताधारी अण्णाद्रमुक (AIADMK) आणि विरोधी द्रमुक पक्ष (DMK) आमनेसामने आहेत. इथे एकाच टप्प्यात संपूर्ण मतदान झालं.
 
तर केरळमध्येही 1, आसाममध्ये 3, पुद्दुचेरीमध्ये एका टप्प्यात मतदान पार पडलं.
 
आसाममधल्या 126, केरळमधील 140, तामिळनाडूच्या 234, पश्चिम बंगालच्या 294 तर पुद्दुचेरीमधल्या 30 जागांसाठी या निवडणुकांमध्ये मतदान झालं.
 
या पाचही राज्यांची मतमोजणी 2 मे रोजी होऊन निकाल लागतील.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments