Festival Posters

बिहारमध्ये वीज कोसळून ११० ठार

शुक्रवार, 26 जून 2020 (08:35 IST)
बिहारमध्ये गुरुवारी ठिकठिकाणी वीज कोसळून 110 जण मरण पावल्याची दुर्घटना घडली. राज्यभर गुरुवारी विजांनी कहर केला. मृतांमध्ये गोपाळगंजचे 14, सिवान 6, दरभंगा 5, मोतिहारी 3, मधुबनी 8, नवादा 8, तर बेतियातील दोघांचा समावेश आहे.
 
भागलपूर जिल्ह्यातही 7 जण मरण पावले आहेत. शिवाय, सीवानच्या भगवानपूर आणि अरुआ गावांत वीज कोसळल्याने घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पूर्व चंपारण्यमध्ये तसेच बांका जिल्ह्यात प्रत्येकी 5 जण मरण पावले आहेत. खगडिया आणि औरंगाबादमध्ये (बिहार) प्रत्येकी 3, पश्‍चिम चंपारण्य, किशनगंज, जहानाबाद, जमुई, पूर्णिया, सुपौल, कैमूर व बक्सर में 2-2 जण मरण पावले आहेत. समस्तीपूर, शिवहर, सारण, सीतामढी आणि मधेपुरात प्रत्येकी एकजण मरण पावला आहे. गोपाळगंजच्या उचका गावात शेतात काम करत असलेले 7 जण मरण पावले. शिवाय, बरौलीत 2,  सोनबरसा आणि खजुरियात प्रत्येकी 1 जण मरण पावला. अनेक जखमींपैकी 6 जण अत्यवस्थ आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी बिहारच्या 23 जिल्ह्यांतून रेड अ‍ॅलर्ट जारी केला आहे. पूर्व चंपारण्य, प. चंपारण्य, गोपाळगंज, सीतामढी, मधुबनी, सुपौल, अररिया, किशनगंज, पूर्णिया, सहरसा व मधेपुराचा त्यात समावेश आहे. कटिहार, भागलपूर, बांका, मुंगेर, खगडिया आणि जमुईत मुसळधार पाऊस होईल, असाही अंदाज आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या घटनेवर शोक व्यक्‍त केला असून, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

पुढील लेख
Show comments