Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रवासी बसची ट्रकशी भीषण टक्कर, दोन्ही वाहनांना आग लागल्याने १४ जण जिवंत जळाले

Updated: गुरूवार, 26 मार्च 2026 (09:28 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशातील मार्कापूर जिल्ह्यातील रायवरमजवळ झालेल्या एका भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण परिसर हादरला.  एक प्रवासी बस आणि खडीने भरलेल्या टिपर ट्रकची जोरदार टक्कर झाली. टक्कर होताच दोन्ही वाहनांना आग लागली, ज्यामुळे त्यातील प्रवाशांना बाहेर पडता आले नाही.
 
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आग इतक्या वेगाने पसरली की बसच्या मागील भागात बसलेले प्रवासी आत अडकले. धूर आणि आगीच्या ज्वाळांमुळे गुदमरून आणि भाजल्याने चौदा जणांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने सुमारे डझनभर जखमींना वाचवण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
ALSO READ: वीज बिलावरील नाव बदलण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेची २५ लाख रुपयांची फसवणूक
मार्कपुरमचे उपअधीक्षक (डीएसपी) नागराजू यांनी या घटनेला दुजोरा दिला आणि सांगितले, "या अपघातात सुमारे १४ जण जिवंत जळाले. आतापर्यंत डझनभर जखमींना वाचवून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही मृतदेह अडकल्याची भीती असून, त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे."
ALSO READ: बांगलादेशमध्ये प्रवाशांनी भरलेली बस पद्मा नदीत कोसळून २३ जणांचा मृत्यू
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments