Festival Posters

नवरात्रीत अखंड ज्योत लावण्यामागे हे आहे कारण

नवरात्रीत देवीची कृपा मिळवण्यासाठी अखंड ज्योत लावली जाते. ज्या घरात नवरात्रीत अखंड ज्योत जळते त्या घरात नकारात्मकता येत नाही. 
 
तसेच अखंड दिवा लावल्याने शनीचा कुप्रभाव कमी होतो. कामात येत असलेले अडथळे आपोआप दूर होतात. शनि दोष असेल अश्या घरात तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. ज्याचा अधिक प्रभाव पडतो आणि शनी शुभ फल देतं.
 
तसेच आपल्याला घरात सकारात्मक वातावरण हवं असल्यास शुद्ध तुपाचा दिवा लावावा. याने घरातील आजार दूर पळतात. वाद- भांडण, मानसिक ताणापासून मुक्ती मिळते.
 
शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील अखंड ज्योतीचे फायदे आहेत. अभ्यासात चांगले परिणाम मिळावे यासाठी विद्यार्थ्यांने दिव्यात तुपाची भर घालावी. नियमित पूजा करावी तर स्मरण शक्ती वाढेल आणि अभ्यासात ही मन रमेल.
 
याचे वैज्ञानिक फायदे बघायला गेलो तर घरात तुपाचा अखंड दिवा लावल्याने श्वास आणि नर्व्हस सिस्टमवर प्रभाव पडतो आणि दिव्यात किंवा यासोबत सकाळ-संध्याकाळ कापूर जाळल्याने बॅक्टेरिया मरतात आणि फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर ठरतं. कापूरच्या सुगंधाने चित्त शांत राहतं आणि घरात सुखद वातावरण निर्मित होतं.

सर्व पहा

भगवान शिवाचे रहस्यमयी मंदिर; जिथे येतो दगडांमधून डमरूचा आवाज

आरती सोमवारची

जर तुम्हाला वाहन सुख हवा असेल तर सोमवारी हा सोपा उपाय करा

अधिक मास पौर्णिमा २०२६: चंद्राला अर्घ्य देण्याचे महत्त्व आणि पूजा विधी

अधिक मासातील ज्येष्ठ पौर्णिमेला तुम्हाला या गोष्टी दिसल्या तर, समजा देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

पुढील लेख
Show comments