Festival Posters

अजित पवारांचा फक्त फुटीर गट

मंगळवार, 4 जुलै 2023 (07:47 IST)
मुंबई : अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. अजित पवार यांनी केलेल्या नियुक्त्या कायदेशीर आहेत का, असा सवाल केला. शरद पवार यांना तुम्ही अध्यक्ष मानता, मग त्यांनी घेतलेले निर्णय तुम्हाला मान्य आहेत का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. तसेच अजित पवारांचा फक्त फुटीर गट आहे. त्यामुळे त्यांना फक्त इतर पक्षात विलीन होता येते, असे आव्हाड म्हणाले.
 
शरद पवार यांना अध्यक्ष मानता. मग सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर त्यांनी केलेली कारवाई मान्य करणार का, असा सवाल करीत आव्हाड यांनी शरद पवार अध्यक्ष आहेत. त्यांनी जयंत पाटील यांची नियुक्ती केली आहे, असे म्हटले.अजित पवारांनी केलेल्या नियुक्त्या कायदेशीर आहेत का? शरद पवार अध्यक्ष आहेत. मग यांनी केलेल्या नियुक्त्या घटनात्मक कशा, पक्षाची मान्यता नाही त्यांना नियुक्त्या करण्याचा अधिकार नाही. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबित केले आहे, त्यांना कोणतेच अधिकार नाहीत. अजित पवारांची पत्रकार परिषद किटी पार्टी होती, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
 
त्यांनी वाटलेल्या पदांना संविधानिक मान्यता नाही
सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान विविध पदे वाटली. पण त्यांना संविधानिक मान्यता नाही. एकच राष्ट्रवादी पक्ष आहे, त्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत. अध्यक्षांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना निलंबित केले आहे. त्यामुळे त्यांना कोणालाही नियुक्त करता येत नाही, असे आव्हाड म्हणाले.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय खोकल्याचे सिरप मिळणार नाही! केंद्र सरकार ने केले नियमांत बदल

मसुरीच्या होमस्टेमध्ये महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरचा गूढ मृत्यू; दारूच्या बाटल्या आणि पतीचा संशयास्पद जबाब

मुलींना मिळणार ५० हजारांची मदत? जाणून घ्या सरकारच्या या योजनेबद्दल

वर्ध्यात ८८,००० विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार

गिरगावात तांदळातील कीटकनाशकाच्या वासामुळे २ वर्षांच्या चिमुरडीची मृत्यूशी झुंज; १५ तासांत ३ वेळा हृदयविकाराचा झटका

पुढील लेख
Show comments