Dharma Sangrah

Cabinet meeting decisions : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले गेले हे महत्वाचे निर्णय

मंगळवार, 4 जुलै 2023 (18:22 IST)
राज्यात राजकीय भूकंप आला असून राष्ट्रवादी पक्षातील नेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा देत शिंदे- फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत त्यांनी आपली उपस्थिती लावली. राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली असून त्यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 
 
आज घेतलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्याचे हायड्रोजन धोरण जाहीर करण्यात आले असून महाराष्ट्र हे धोरण जाहीर करणारे पहिले राज्य ठरले आहे. तसेच मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षण घेण्यासाठी 'सयाजीराव गायकवाड -सारथी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. अनेक दिवसांपासून हा निर्णय प्रलंबित असून आज त्यावर निर्णय घेण्यात आला. 

दिंडोरी तालुक्यात चिमणपाडा आणि त्र्यम्बक तालुक्यात कळमुस्तेतील प्रवाही वळण योजनेला मान्यता देण्यात आली. नागपूर येथील मे.शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ देण्यासंबंधीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत निर्णय घेण्याय आला. नागपूर कृषि महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र तयार होणार आहे.
 
  Edited by - Priya Dixit    
 
 
 

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

LIVE: २७ जून रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा जारी

बारमाही नफा देणारा व्यवसाय, बाजारात दररोज प्रचंड मागणी; टोमॅटोची यशस्वी लागवड

अपघाताशिवाय कारमधील एअरबॅग अचानक उघडल्याने तरुणाचा गुदमरून मृत्यू

महाराष्ट्रात १५ जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा धोका, हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला

बारामती पाणीपुरवठा प्रकल्पांना गती, सुनेत्रा पवार यांचे डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश

पुढील लेख
Show comments