Marathi Biodata Maker

शाळा सुरु होणार? दोन दिवसात कळेल

गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (17:16 IST)
कोरोनाने मांडलेल्या तांडवामुळे गेल्या दीड वर्षांपासून मुलांनी शाळेचं तोंड देखील बघितलं नाहीये. कोरोना महामारीमुळे लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत अर अजूनही संसर्गाचा धोका टळलेला नाहीये. त्यामुळे शाळा, कॉलेजेस गेल्या दीड वर्षांपासून बंद ठेवण्यात आले आहेत. सध्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण दिलं जातं आहे. 
 
मात्र आता कोरोनाचं प्रमाण कमी होत असताना सर्व निर्बंध शिथिल होऊ लागले असून हळूहळू दुकानं, मॉल्सही, गार्डन इतर सुरु करण्यात आले असली तरी शाळा कधीपासून सुरु होणार हा प्रश्न पालकांना पडला आहे. यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी माहिती देत सांगितलं की येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल.
 
बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली की राज्य सरकार शाळा सुरु करण्याचा विचार करत आहे. मात्र इतर राज्यांमध्ये कोरोना प्रभाव पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.
 
ते म्हणाले की शाळा करण्याबाबत विचार करताना आधी राज्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेतली जाईल. तसंच कोरोना टास्क फोर्सच्या सूचनांकडेही लक्ष देऊन त्यानुसार SOP मध्ये बदल केले जातील. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

Supplementary Result 2026: दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार

येवला-नांदगाव महामार्गावर लक्झरी बस उलटली; अपघातात एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १५ दिवसांच्या आत फेरनिवडणूक घेण्याचा अल्टिमेटम देण्यात आला

सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला पक्षातूनच आव्हान; १५ दिवसांच्या आत फेरनिवडणूक घेण्याचा अल्टिमेटम देण्यात आला

गोपाळ गणेश आगरकर जयंती; महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ

पुढील लेख
Show comments