पिकावरील किडींचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी फवारण्यात येणाऱ्या कीटकनाशकाने शेतकरी आणि शेतमजुरांचा जीव घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत १८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर ७५० शेतकऱ्यांवर उपचार सुरु असून २५ शेतकऱ्यांना अंधत्व आले आहे. यवतमाळमधील घटनेची शेतकरी संघटनांनी दखल घेत राज्य सरकारकडे पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी केली होती.