Festival Posters

बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून शेतकरी बालंबाल बचावला

बुधवार, 9 मार्च 2022 (15:10 IST)
शेतात पाणी भरत असताना शेतकऱ्यांवर बिबट्यांने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे घडली आहे. दैव बलवत्तर म्हणून दोन शेतकरी या बिबट्याच्या हल्ल्यात वाचले. दरम्यान परिसरात सापळा बसविण्यात यावा अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी, कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे शेतामध्ये भिकाजी बोडखंळ व दिनकर बोंडखळ शेतीला पाणी भरत होते. व्यंकट बोंडखळ यांना बिबट्या चाल करून जात असताना दिसला त्यांनी मोठ्याने आवाज देत बोंडखळ यांना सावध केले. मोठी डरकाळी फोडत बिबट्या अंगावर झेप घेण्याच्या स्थितीत असतानाच आपल्या जवळच्या बॅटरी चालू करत बिबट्याच्या डोळ्यावर चमकवल्या त्यामुळे बिबट्या तिथेच थबकला.
 
व्यंकट बोंडखळ यांनी सावध पवित्रा घेत सयराम बोंडखळ, भाऊसाहेब बोंडखळ, नितीन रांधवण, भास्कर होन त्यांना आवाज देत बोलावून घेतले. सयराम बोंडखळ यांचा ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी चालू करत बिबट्याच्या दिशेने फिरवला मग मात्र बिबट्याने तिथून पळ काढला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून पिंजरा लावला जात नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

जिओ टीव्ही प्रो पॅक लॉन्च, फक्त ५५ रुपयांमध्ये १०००+ लाईव्ह टीव्ही चॅनेल्स, ओटीटी आणि प्रीमियम फीचर्सचा लाभ घ्या

LIVE: महाराष्ट्राच्या संपूर्ण किनारपट्टीवर भरतीचा इशारा

महाराष्ट्रात वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी रहिवासी असणे अनिवार्य, १ ऑगस्टपासून नियम लागू होणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या हप्त्यात वाढ होण्याची शक्यता

पुण्यात कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची इमारत कोसळली, ३ कामगारांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments