Dharma Sangrah

उमदीत टोळी युद्ध, दोघांचा खून, एक चिंताजनक

बुधवार, 9 मार्च 2022 (15:02 IST)
सांगलीतील जत तालुक्याच्या उमदी येथे दोन टोळी युद्धाचा मंगळवारी रात्री भडका उडाला. या भडक्याने दोन तरुणांचा बळी घेतला आहे. दोघा तरुणांना धारधार शत्राने वार करून निर्घृण खून करण्यात आले. तर एक जण गंभीर जखमी असून त्याचीही प्रकृती चिंताजनक बनली आहे. उमदी पंढरपूर मार्गावर हा थरार घडला आहे. या दुहेरी खुनाच्या घटनेने जत तालुका हादरला आहे. या प्रकरणी संशयित 12 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
मदगोंडा नागा बगली (वय 24) व संतोष राजू माळी (वय 23) रा.उमदी अशी मृत तरुणांची नावे आहेत. तर प्रकाश मल्लिकार्जून परगोंड (वय 22) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस अधिक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले यांनी भेट दिली आहे. उमदी येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील वादातून आणि पूर्वैमनस्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून जत येथील एका टोळीचा म्होरक्या, उमदी येथील सहकारी तसेच उमदी येथील एक टोळी यांच्यात सतत संघर्ष सुरू होता. त्याची किनार या घटनेला असल्याचे सांगण्यात येत आहे.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

अमरावती न्यायालया कडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा

LIVE: सुप्रिया सुळे यांची आणीबाणी जाहीर करण्याची मागणी

मुसळधार पावसासाठी राज्य सरकार सतर्क; एनडीआरएफ-एसडीआरएफला २४ तास सतर्क राहण्याचे निर्देश

राज्यात मुसळधार पावसाच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांची आणीबाणी जाहीर करण्याची मागणी

मुंबईत मुसळधार पावसामुळे ७ जणांचा मृत्यू, रेड अलर्ट जारी

पुढील लेख
Show comments