Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देवेंद्र फडणवीसांना हायकोर्टाचा झटका

Updated: शुक्रवार, 5 मे 2023 (07:49 IST)
देवेंद्र फडणवीस यांनी सन २०१६ मध्ये नगर विकास मंत्री असताना दिलेला निर्णय उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला तर एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या असलेल्या याच खात्याने फेब्रुवारी २०२३ मध्ये जारी केलेल्या आदेशावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.
 
मात्र घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पापासून ५०० मीटर अंतरापर्यंत बफर झोन असावा, असे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने स्पष्ट केले होते. बफर झोन ठरवताना प्रदुषण नियंत्रण मंडळाची सुचना विचारात घ्यायला हवी होती. तसे न करताच १ डिसेंबर २०१६ रोजी तत्कालीन नगर विकास मंत्री फडणवीस यांनी बफर झोनची मर्यादा ठरवली, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले.
 
तसेच ७ फेब्रुवारी २०२३ रोजी नगर विकास मंत्रालयाने पालिका आयुक्तांना कळवले आहे की, बफर झोन ५०० मीटर अंतर असावा. या आदेशानुसारच कोल्हापूर पालिकेने बफर झोन ठरवायला हवा, असे आदेश देत न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांनी १ डिसेंबर २०१६ रोजी दिलेले आदेशच रद्द केले. न्या. ए. एस. चांदुरकर व न्या. एम. डब्ल्यू. चांदवानी यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले.
 
याप्रकरणी मेसर्स भीमा महाभारत बिल्डर्स अॅण्ड डेव्हल्पर्स व अन्य यांनी याचिका केली होती. तत्कालीन नगर विकास मंत्री, नगर विकास प्रधान सचिव, कोल्हापूर महापालिका आयुक्त, शहर नियोजन विभागाचे सहाय्यक संचालक यांना प्रतिवादी करण्यात आले होते.
 
घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पासून १६२ ते १८२ मीटरचा परिसर बफर झोन म्हणून ग्राह्य धरावा, असे आदेश तत्कालीन नगर विकास मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ डिसेंबर २०१६ रोजी दिले होते. या संदर्भात याचिका करण्यात आल्या होत्या.
१ एप्रिल २००७ रोजी प्रताप अरविंद दिवाण यांनी कोल्हापूर पालिकेकडे अर्ज केला होता. कसबा बावडा येथील भूखंडावर रहिवाशी इमारत व रस्ता बांधण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली होती. ११ फेब्रुवारी २००८ रोजी पालिकेने दिवाण यांचा अर्ज अमान्य केला. हा भूखंड घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या ५०० मीटरच्या परिसरात येतो. तेथे बांधकामास परवानगी देता येणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

गणेशोत्सवात मंडपात 'महाप्रसाद' वाटण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर मुंबईच्या परळ भागात तणाव

महाराष्ट्रात H1N1 इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढला; १,१०९ रुग्णांची नोंद, त्यापैकी ६५% रुग्ण पुणे आणि मुंबईतील

Central Railway Updates: टिटवाळा स्थानकावर २८ ऑगस्टपासून १५ दिवसांचा 'मेगा ब्लॉक'; अनेक लोकल गाड्या रद्द होणार

नेपाळमधील पुरामुळे हत्ती वाहून भारतात आले; त्यांची अवस्था पाहून लोकांचे मन हेलावले

पुढील लेख
Show comments