Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पक्षात वहिनींचा हस्तक्षेप वाढला होता; शिंदे गट आमदाराचा रश्मी ठाकरेंवर रोख

Updated: गुरूवार, 23 फेब्रुवारी 2023 (09:27 IST)
 
यावेळी भरत गोगावले म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्णयात माँसाहेबांनी कधीच हस्तक्षेप केला नाही. उलट माँसाहेबांनी कार्यकर्त्यांना प्रेम दिले. म्हणून माँसाहेबाप्रती शिवसैनिकांचा आई-वडीलांपेक्षाही जास्त आदर तयार झाला. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल द्वेष निर्माण होण्याची कारणे तपासली पाहीजेत. एक किंवा दोन नाही तर तब्बल 40 आमदार, 13 खासदार, शेकडो नगरसेवक, हजारो कार्यकर्त्यांनी आज उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. तेही सत्ता असताना पक्षाला सोडून गेले, याचे कुठेतरी चिंतन करायला हवे.” असे गोगावले म्हणाले आहेत.
 
पुढे बोलताना ते म्हणाले, “उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असताना आम्ही वारंवार त्यांच्याकडे आमच्या अडचणी, कार्यकर्त्यांचे प्रश्न, मतदारसंघातील समस्या घेऊन जात होतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल आम्ही जेव्हा जेव्हा तक्रार करायचो, तेव्हा उद्धव ठाकरे त्याकडे गांभीर्याने पाहत नसत. कोणताही निर्णय घेत नसत. मग हळूहळू आमच्या भावना तयार होत गेल्या की, यांना आमची गरज नाही. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि माझे कुटुंब एवढ्यापुरतेच ते मर्यादीत राहिले होते.” असे गोगावले म्हणाले.
 
गोगावले यांचा आरोप
 
“उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय पक्ष संघटनेत हस्तक्षेप करायला लागले होते. त्यांचे मेव्हणे, भाचे आणि वहिनी कळत-नकळत हस्तक्षेप करत होत्या” असा आरोप गोगावले यांनी केला आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

आर. प्रज्ञानानंदने सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेच्या रॅपिड गटात अव्वल स्थान पटकावले

नाशिक जिल्ह्यातील 'उधमाळ' ठरणार भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय 'डार्क स्काय' गाव

"देवेंद्रजींनी महाराष्ट्रातच राहावं!" – दिल्लीतील चर्चांवर अमृता फडणवीस पुन्हा बोलल्या; राजकीय वर्तुळात वक्तव्याची जोरदार चर्चा

मध्य रेल्वेने तिकीटविरहित किंवा अनधिकृत प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कठोर नियम केले

"निवडून आलो म्हणजे सात-बारा आपला होत नाही" – एकनाथ शिंदे यांचा चार मंत्र्यांना थेट इशारा

पुढील लेख
Show comments