suvichar

कोल्हापूरात मोबाईल इंटरनेट सेवा आज बंद

कोल्हापूर जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा आज बंद करण्यात आली आहे. कोल्हापूरचे जिल्हादंडाधिकारी नंदकुमार काटकर यांनी हे आदेश दिले आहेत.
 
समाजामध्ये तणाव निर्माण करणाऱ्या मेसेज आणि व्हिडीओंचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसार होऊन, जातीय तेढ निर्माण होईल. त्याद्वारे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा बिघडेल. यामुळे 3 जानेवारी 2018 रोजी रात्री 8 वाजल्यापासून 4 जानेवारी 2018 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, असं प्रशासनामार्फत सांगण्यात आलं आहे. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या मोबाईल कंपन्यांवर भारतीय दंड संहिता आणि इतर संबंधित कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे.
 
भीमा कोरेगाव दगडफेकीचे कोल्हापुरात मोठे पडसाद उमटले आहेत. यानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हिंदुत्ववादी आणि दलित कार्यकर्ते समोरासमोर येऊ नये, यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

कमी खर्चात भरपूर नफा मिळवून देणारा एक उत्तम शेती व्यवसाय; गवारीच्या शेंगाची लागवड

LIVE: महाराष्ट्रात लवकरच समान नागरी संहिता लागू होणार!

केतन अग्रवाल हत्या प्रकरण: आरोपी सिया गोयल आणि प्रियकराने तीन वेळा हत्येचा प्रयत्न केल्याची कबुली दिली

ममता बॅनर्जी यांनी पक्षातून ८ नेत्यांना काढून टाकले; बंडखोरांनी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली?

महाराष्ट्रात लवकरच समान नागरी संहिता लागू होणार! फडणवीस सरकारने विधानसभेत मोठी घोषणा केली

पुढील लेख
Show comments