suvichar

मुंबई थंडी वाढली! कमी तापमानाची नोंद

सोमवार, 16 जानेवारी 2023 (14:47 IST)
मुंबई : मुंबईत हुडहुडी वाढली आहे. या वर्षीच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईत आज (दि. १६) सकाळी पारा १३.८ अंशावर पोहोचला होता. यंदाच्या हिवाळ्यातील हे सर्वात निच्चांकी तापमान आहे. मुंबईत १५ ते १७ जानेवारी दरम्यान थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून मागील आठवड्यात वर्तवण्यात आला होता. त्यानुसार, मुंबईतील तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे.
 
दरम्यान, मुंबईत रविवारी (दि. १५) दिवसाच्या कमाल तापमानामध्ये देखील घट झाली आहे. रविवारी कमाल तापमान २६.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. हे तापमान सामान्य तापमानापेक्षा पाच अंश कमी आहे. या हिवाळ्यामध्ये आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान २५ डिसेंबर रोजी १५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. त्यानंतर आज १३.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
 
मुंबईची हवा आज दिल्लीपेक्षाही वाईट स्थितीमध्ये गेल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे हवा प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे बघायला मिळाले. मुंबईतील तापमानामध्ये घट झाल्यानंतर शहरामधील हवा गुणवत्ता पातळी कमालीची खालवली आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्यापुन्हा एकदा डोके वर काढू शकतात. मुंबईतील किमान तापमानामध्ये यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी अशी नोंद बघायला मिळाली आहे. मुंबईतील किमानतापमान १३.८ अंशांवर गेल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे मुंबईतील हवा गुणवत्ता पुन्हा एकदा अत्यंत वाईट स्थिती गेल्याची बघायला मिळाली. दिल्लीपेक्षा देखील जास्त मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक खालावल्याचे सफरच्या नोंदीनुसार पाहायला मिळाले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

LIVE: भिवंडीतील एकाच दुकानातील दूषित शोरमा खाल्ल्याने ५९ जणांना विषबाधा!

मंत्री गिरीश महाजन यांचा एका मुलीसोबतचा व्हायरल फोटो राजकीय गदारोळाचे कारण ठरला, प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले

एकाच दुकानातून शोरमा खाल्ल्याने ५९ जण रुग्णालयात दाखल; भिवंडीत अन्न विषबाधेचा कहर

योगासाठी केवळ आसनेच नव्हे, तर आदर आणि कृतज्ञता यांचीही आवश्यकता असते; श्री श्री रविशंकर ध्यानाचा खरा मंत्र प्रकट करतात

कोलकाता विमानतळावर आगरतळ्याला जाणाऱ्या इंडिगो विमानावर वीज कोसळली

पुढील लेख
Show comments