Festival Posters

‘ऑनलाईन’ ओझ्याने घेतला मुख्याध्यापकाचा जीव

रविवार, 29 एप्रिल 2018 (00:30 IST)

मनमाडजवळ राहणाऱ्या मुकुंददास शोभावंत या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन कामाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमध्ये आता तणावग्रस्त शिक्षकांची संख्याही वाढताना दिसत आहे. ही चिंताजनक बाब आहे.

डिजीटल इंडियाच्या नावाखाली कामाचा ताण वाढविण्याचा प्रकार सुरू आहे. ऑनलाईन माहिती भरणे, निकालासंबंधीची कामे, शालेय पोषण आहाराअंतर्गत धान्याचा साठा मोजणे, शासनाच्या योजनेंतर्गत शौचालय बांधकामाचा अहवाल देणे अशा एक ना अनेक गोष्टी शिक्षकांना कराव्या लागत आहेत. विद्यादानाचे काम बाजूला ठेवून ऑनलाईन माहितीचे तक्ते भरण्याची तारेवरची कसरत त्यांना करावी लागत आहे. ऑनलाईन पद्धतीत ग्रामीण भागात नेटवर्क तसेच अनेक मुलभूत सुविधांची वानवा आहे. सरकारने शिक्षकांवर लादलेल्या या अतिरिक्त ओझ्यामुळे शिक्षक वर्ग सध्या तणावाखाली जगत आहे. सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढा देण्यास सज्ज आहे. आमच्या शेतकऱ्यांना, अंगणवाडी सेविकांना आणि शिक्षकांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

विद्यापीठ विस्तार आणि आर्थिक क्षेत्रातील नवीन भरतीला मंजुरी, महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय

नाशिकातून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता, पोलिसांनी तपास सुरु केला

नाशिकमध्ये दारूचे पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

नाशिकमधील बस स्थानकावर एका महिला प्रवाशाचे दागिने आणि रोख रकम चोरली

सुरतमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या दोन बसची धडक, पाच जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments