Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महापुरानंतर मुंबई मनपाची विराट कारवाई उचलला साडेतीन हजार टन कचरा

Updated: सोमवार, 26 ऑगस्ट 2019 (10:11 IST)
 
महापुरानंतर खºयाअर्थाने स्वच्छतेचे मोठे आव्हान सांगली महापालिकेसमोर होते. अशा संकटसमयी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह राज्यातील नगरपालिका सांगलीच्या मदतीला धावून गेले, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सफाई कामगार व अधिकाºयांचे पथक सांगलीला पाठविले होते. या पथकाचे नेतृत्व कार्यकारी अभियंता सुनील सरदार व स्वच्छ भारत अभियानाचे प्रमुख सुभाष दळवी यांच्याकडे सोपविण्यात आले. मुंबई महापालिकेचे ४०० कर्मचारी व ५० वाहनचालक, १२ डंपर, ७ सक्शन व जेटिंग व्हॅन, २ जेसीबी, ३ स्मॉल अर्थमुव्हर यंत्रे असा सर्व ताफा मुंबईतून १२ आॅगस्ट रोजी रात्रीतच सांगलीमध्ये दाखल झाला.१५ आॅगस्ट रोजी साधारणत: ७० टक्के परिसर स्वच्छ झाला होता. १६ रोजी पूरग्रस्त नागरिक व व्यावसायिक घरी, दुकानांकडे परतू लागले. परिणामी घरातील व दुकानातील साहित्य, फर्निचर, कपडे, पुस्तके, सडलेले खाद्यपदार्थ आदीमुळे शहरामध्ये कच-याचे ढीग व दुर्गंधी पसरली होती. ही परिस्थिती पाहून मुंबईच्या पथकाचा मुक्काम आणखी दोन ते तीन दिवस वाढविण्याचा निर्णय घेतला.
 
दि. १७ ते १९ आॅगस्टदरम्यान शहरातील बाजारपेठा, रहिवासी विभाग व बफरझोनमध्ये स्वच्छता केली. या पथकाने जवळपास साडेतीन हजार टन कचरा उचलून तो डेपोवर पोहोचविला आहे. त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

सीजेपी प्रमुख अभिजित दीपके यांचा भाजपकडून धमकीचा आरोप, भाजपने आरोप फेटाळले

पालघर सरकारी जमीन एम.एस.आर.डी.सी.कडे सुपूर्द,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली

LIVE: महाराष्ट्र सरकार कडून 'अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत ७ हजार कोटी रुपयांना मंजुरी

संगमनेर निवडणूक प्रकरणात अमोल खताल यांच्या याचिकेवरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने मार्ग मोकळा केला

नेपाळमध्ये अशांतता, हिंसाचारात एकाचा मृत्यू, अनेक शहरांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू

पुढील लेख
Show comments