नीट-यूजी २०२६ परीक्षेत गैरप्रकार आणि प्रश्नपत्रिका फुटल्याचे वृत्त समोर आल्यानंतर हा संपूर्ण वाद सुरू झाला. कॉकरोच जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी संघटनांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन केले. धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरणे, संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि स्पर्धा परीक्षांच्या आयोजनात व्यापक सुधारणात्मक उपाययोजना करणे, या विद्यार्थ्यांच्या मुख्य मागण्या होत्या.NEET पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर सलग २८ दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 25, 2026
आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला…