Marathi Biodata Maker

आधी राम मंदिर कधी होणार ते सांगा, हैदराबादचे नंतर बघू - शिवसेनेची टीका

शिवसेनेन राम मंदिर मुद्दा उचलून धरला आहे. यामध्ये शिवसेना सतत भाजपवर टीका करत आहे. यात हैदराबादचे नाव बदलायचे असे सुरु तेव्हा शिवसेनेन पुन्हा भाजपवर टीका केलिया आहे. आधी राम मंदिर कधी होणार ते सांगा , राम मंदिर प्रश्न महत्वाचा आहे, हैदराबादचे आपण नंतर बघू असे बोल सुनावले आहे. तर मुघल आणि इतर राजवटी सुद्धा होत्या त्यांची नावे सुद्धा बदलली पाहिजे, विशेष करून निजामचे राज्य असलेल्या मराठवाडा भागातील अनेक शरांची नावे बदलली पाहिजे अशी भूमिका शिवसेना घेत आहे.
 
प्रश्न हैदराबादचे भाग्यनगर कधी होणार हा नसून अयोध्येत राममंदिर कधी होणार हा आहे. रामाचा वनवास कधी संपणार ते सांगा. रामाचे भाग्य कधी फळेल ते जाहीर करा. योगी हे मुख्यमंत्री म्हणून प्रचारात तोफा डागत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने दुकान बंद करून प्रचाराची फळी सांभाळली आहे. जातील तेथे घोषणा व नामांतर असेच सुरू आहे. योगी यांची एक सभा मराठवाडय़ात लावा, म्हणजे औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशीव सहज होईल.
 
तेलंगणात भाजप सत्तेवर आल्यास हैदराबादचे नावभाग्यनगर करू, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे. निजामाच्या खुणा पुसून टाकून हैदराबादचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे असेही योगींचे म्हणणे आहे. योगी हे भगवे वस्त्रधारी आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिका स्पष्ट आहेत. तेलंगणात सत्ता आली तर ओवेसी बंधूंना हाकलून देऊ, असेही त्यांनी जाहीर केले आहे. तेलंगणात निजामाच्या खुणा आहेत व ओवेसी बंधू हे निजामाचे वंशज असल्यासारखेच वागतात. 
 
त्यामुळे सरदार पटेलांचा उंच पुतळा उभा करणाऱ्यांनी निजामाची वळवळ थांबवायला हवी. पटेलांनी पोलीस ऍक्शन घेऊन निजामास गुडघे टेकायला लावले, पण हैदराबादेतील मुसलमान समाज आजही निजामाच्याच काळात तरंगत आहे. असे असले तरी ओवेसी बंधू व त्यांच्या ‘एमआयएम’ पक्षाचे राजकारण भाजपसारख्या पक्षांना फलदायी ठरते असेही आक्षेप घेतले जातातच. ओवेसी यांना वापरून राममंदिर प्रश्नी देशात दंगली घडवायचा डाव असल्याची पिचकारी मुंबईतील एका राजकीय नेत्याने मारली. 
 
ओवेसी म्हणजे भाजपची बटीक असल्याचा आरोप देशातील इतर पक्षही करतात.ओवेसींबरोबर आता प्रकाश आंबेडकर आहेत. त्यामुळे उत्तरेत व इतरत्र काँग्रेसचे नुकसान तसेच भाजपचा कसा फायदा होईल अशी गणिते मांडली जात आहेत. त्यामुळे योगी यांनी हैदराबादचे भाग्यनगर करायचे ठरवले या भूमिकेस महत्त्व आहे. पण निजाम-बाबराच्या खुणा फक्त हैदराबादेतच आहेत काय? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. संपूर्ण देशभरात आहेत. आमच्या मराठवाडय़ाने निजामाचा अत्याचार सोसला आहे. 
 
त्यामुळे औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव कधी होणार? पुन्हा खुल्ताबाद, अहमदनगर ही नावे आहेतच.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

गुन्हे शाखेने पुण्यातील रेव्ह पार्टीवर छापा टाकला; तीन अल्पवयीन मुलांसह १५६ श्रीमंत व्यक्तींना ताब्यात घेतले

१५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलामुलींचे आधार कार्ड निष्क्रिय केले जाऊ शकते, माहिती जाणून घ्या

LIVE: वर्ध्यातील ४१,३४० विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार

वर्ध्यातील ४१,३४० विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार

वनप्लस टर्बो 6X आणि 6X प्रो चे स्पेसिफिकेशन्स लीक झाले, किंमत वैशिष्टये जाणून घ्या

पुढील लेख
Show comments