Marathi Biodata Maker

राज्य मंडळाचा इयत्ता पहिली ते नववीच्या निकाल प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल, उत्तरपत्रिका दाखवणे बंधनकारक

वेबदुनिया न्यूज टीम
बुधवार, 29 एप्रिल 2026 (13:20 IST)
राज्यात उन्हाळी सुट्ट्या यंदा २  मे पासून लागणार असून १ मे रोजी इयत्ता पाहिली ते इयत्ता नववीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्य मंडळाने निकाल प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले असून पहिल्यांदाच इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचा पालकांना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दाखवणे शिक्षकांसाठी बंधनकारक केले आहे.
ALSO READ: दहावी-बारावी निकाल: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बोर्डाचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता; शिक्षण मंडळात खळबळ
शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका व्यवस्थित आणि बारकाईने तपासावी लागणार आहे. या संदर्भात शिक्षण आयुक्तांनी आदेश जारी केले आहे.  
ALSO READ: फडणवीस सरकारने शिंदे यांचे ११ तलाव प्रकल्प थांबवले
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, विद्यार्थ्यांचा विकास होणे आणि त्यांची वैशिष्ट्यपूर्ण क्षमता ओळखणे आवश्यक आहे त्यानुसार, निकालाच्या दिवशी निकाल येताना त्यांच्या उत्तरपत्रिका दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणे करून अचूक मूल्यांकन करता येईल. तसेच पालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांची अध्ययनातील गरज ओळखून योग्य उपाययोजना करता येऊ शकेल. या निर्णयामुळे पालकांची जबाबदारीही वाढणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत पालक अधिक सजग व जबाबदार बनतील.
ALSO READ: भाजपचा मोठा निर्णय, आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित झाली
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयी जसे वाचन, लेखन आणि वेळेचे नियोजन विकसित करण्यासाठी पालक सक्रिय सहभाग घेतील. शाळा आणि घर यांच्यात समन्वय वाढून सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण होईल.या उद्देशानेच राज्य मंडळाच्या सर्व शाळांनी १ मे रोजी निकालावेळी पालकांना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दाखवण्याचे आदेश देण्यात आले आहे. 
Edited By - Priya Dixit

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

LIVE: हवामान विभागाने ठाणे आणि मुंबईसाठी २२ जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी

महाराष्ट्रात २० जुलै रोजी डॉक्टर संपावर जाणार

रशियाचा कीववर मोठा हल्ला: डझनभर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागण्यात आले

फेसबुक डाऊन: लॉगिन समस्या, वेबसाइट बंद

माकडांच्या एका टोळीने राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यात प्रवेश करून बाल्कनीत गोंधळ घातला

पुढील लेख
Show comments