Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यमंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर?

Updated: मंगळवार, 24 डिसेंबर 2019 (13:19 IST)
 
मुख्यंमत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील बैठकीला काँग्रेसकडून कुणीही नेता नव्हता. काँग्रेसकडून मंत्रिपदी कुणाकुणाची वर्णी लावायची याचा अंतिम  निर्णय दिल्लीतील पक्षश्रेष्ठीच घेणार असल्याने मुख्यमत्र्यांसोबतची बैठक काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी तूर्त टाळलचे बोलले जात आहे. याबाबत एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला विचारले असता, काँग्रेसकडून यादी आल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे या नेत्याने सांगितले. मुख्यमंत्री आणि पवार यच्यातील बैठकीबाबत गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजक शब्दांत प्रतिक्रिया दिली. बैठकीतील चर्चेचा तपशील न सांगता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अधिकृत घोषणा मुख्यमंत्री करतील, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे शरद पवार यांनी आधीच एक विधान करून काँग्रेसमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचे अप्रत्क्षपणे सांगितले आहे. राष्ट्रवादीची यादी तयार आहे का, असा प्रश्न विचारला असता, आमची यादी तयार व्हायला उशीर लागणार नाही. आम्हाला कुणाची परवानगी घेण्यासाठी कुठे जावे लागत नाही, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला होता. दुसरीकडे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने आमची यादी दिल्लीत ठरेल असे सांगितले. दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत बैठक होईल व त्या बैठकीत मंत्रिमंडळात काँग्रेसकडून कुणाची वर्णी लागणार, यवर अंतिम निर्णय होईल, असे हा नेता म्हणाला.
 
दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार नोव्हेंबर रोजी सत्तेत विराजान झाले. शिवतीर्थावर झालेल्या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यच्यासह तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन अशा एकूण सहा मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथघेतली. त्यानंतर या सरकारला जवळपास एक महिना होत आला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळेच या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

स्वातंत्र्यदिनी उठून दिसण्यासाठी अशा प्रकारे करा मेकअप

सर्पदंशामुळे ३ आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू प्रकरणी गडचिरोली जिल्ह्यातील शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

LIVE: गडचिरोली जिल्ह्यातील शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

एसटी बस स्थानकांच्या इमारतींना वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप देण्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

ठाणे आणि पालघरमध्ये देशद्रोही सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्या ५ तरुणांना अटक

पुढील लेख
Show comments