Marathi Biodata Maker

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वज फडकावण्याबाबत हे फरक जाणून घ्या

आपला राष्ट्रध्वज आपल्या शान आणि अभिमानाचे प्रतीक आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजारोहण केले जाते. पण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजारोहण करण्यात काही फरक आहे. चला तुम्हाला अशा 3 मोठ्या फरकांबद्दल सांगतो...
 
15 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्यदिनी, राष्ट्रध्वज वरील बाजूस खेचला जातो आणि नंतर फडकवला जातो. याला ध्वजारोहण म्हणतात. दुसरीकडे, 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज वरील बाजूला बांधलेला असतो. त्याला उघडून फडकावला जातो त्याला ध्वज फडकावणे असे म्हणतात. इंग्रजीमध्ये ध्वजारोहणासाठी Flag Hoisting आणि ध्वज फडकावण्यासाठी Flag Unfurling हा शब्द वापरला जातो.
 
पंतप्रधान आणि राष्ट्रपती
15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान सामील असतात. यावेळी पंतप्रधानांनी ध्वजारोहण करतात. 26 जानेवारी रोजी आयोजित मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती ध्वज फडकवतात.
 
जागेचा फरक
स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात येतो. पंतप्रधान तेथे ध्वजारोहण करतात. यावेळी पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करतात. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम राजपथवर आयोजित केला जात असून या दिनी राष्ट्रपती ध्वज फडकवतात.
 
राष्ट्रपती 26 जानेवारीलाच ध्वजारोहण का करतात?
पंतप्रधान हे देशाचे राजकीय प्रमुख असतात तर राष्ट्रपती हे संवैधानिक प्रमुख. 26 जानेवारी 1950 रोजी देशाची राज्यघटना लागू झाली. त्याआधी देशात ना संविधान होते ना राष्ट्रपती. या कारणास्तव, दरवर्षी 26 जानेवारी रोजी राष्ट्रपती राष्ट्रध्वज फडकावतात.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

बीसीसीआयने भारतीय महिला १९ वर्षांखालील संघ जाहीर केला; भाविका अहिरची कर्णधार म्हणून नियुक्ती

डॉ. सेजल पवार कोण आहेत? प्रणित मोरेच्या शोमध्ये वादग्रस्त विधान केल्यानंतर माफी मागत आहेत

ओमानच्या किनाऱ्याजवळ 'सेटेबेलो' या व्यापारी जहाजावर मोठा हल्ला; ३ भारतीय खलाशी ठार

ऋतुराज गायकवाडने इतिहास रचला; विराट कोहलीचा विश्वविक्रम मोडून जगातील नंबर १ फलंदाज बनण्याचा मान मिळवला

टीम इंडियासाठी एक वाईट बातमी; सामना जिंकून देणारा हा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडण्याची शक्यता

पुढील लेख
Show comments