Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजा शिव छत्रपती

Updated: बुधवार, 11 मार्च 2020 (15:24 IST)
 
 
 
आजच्या विज्ञानाच्या काळात गर्भारपणात निरनिराळ्या गोष्टी करायला सांगतात. चांगलं ऐका, चांगलं वाचा, आनंदी रहा, पोषक अन्न खा, जेणेकरून होणारं बाळ स्वस्थ होईल, सदाचारी होईल पण आपण एकदाही हा विचार केला आहे का की शिवबा गर्भात असताना तिसर्‍या महिन्यापासूनच जीजाबाईंवर घोर संकटं आली व त्यांचा जन्म झाल्यावर तर या माता आणि पुत्राला तब्बल दहा वर्षे इकडून तिकडे हिंडाव लागलं. अशात तर एखाद्या बाळाला फार विचित्र आणि विक्षिप्त व्हायला हवं, कारण आजतर अनेक लोकं आपल्या स्वभावासाठी परिस्थितीला दोष देतात परंतु शिवबांचा बाबतीत तसे काही झाले नाही, कारण महापुरुष निर्माण होण्यास जशी अनुकूल परिस्थिती आणि सुशिक्षण हे कारणीभूत असतं. त्याहून जास्त त्याचा माता- पित्याची सदव्रुत्ती आणि संस्कार महत्वाचे असतातं. 
 
 
 
आई ही प्रथम गुरू हे उगाच म्हणत नाही. शिवाजी महाराजांना जीवनातील प्रथम दहा वर्षे आपल्या या गुरूकडून शिक्षणाव्यतिरिक्त नैतिकता, माणूसकी, स्वाभिमान आणि सदाचरण अश्या मौल्यवान गुणांचे बीजारोपण झाले. समज आल्यावर त्यांना स्वधर्माविषयी अतूट श्रद्धा आणि आदर निर्माण झालं. निर्दोष आणि कमजोर लोकांवर अत्याचार करणारे अत्यंत निद्यं आणि विपत्तिमूलक आहे हे त्यांना पटले. अशा लोकांची चाकरी करून योगक्षेम चालवायचा नाही ही शप्पथ त्यांनी वयाच्या 14 व्या वर्षी घेतली. शिवाजी महाराजांच्या गुणांचे किती आणि काय वर्णन करावे ते कमीच पण आजच्या या परिस्थितीत त्यांचातले काही गुण प्रकर्षाने आठवावे वाटतात 
 
 
1) स्वधर्म प्रीति- महाराज अतिशय बुद्धिमान व चपळ तर होतेच परंतु फार लहापणापासूनच त्यांना आपल्या धर्माचा अभिमान होता. वडिलांनी उभारलेल्या दौलतीवर निर्वाह त्यांना मान्य नव्हता. धर्माची होणारी विटंबना आणि अनादर त्यांना सहन होत नसे. स्वराज्य आणि स्वातंत्र्य हेच त्यांचे हेतू. त्यासाठी स्वप्राण गमवावे लागले तरी हरकत नाही असं त्यांच स्पष्ट मत. 
 
 
 
2) धर्म निरपेक्षता - आपल्या धर्मावर प्रेम याचा अर्थ दूसर्या धर्माच्या लोकांना त्रास देणे किंवा त्यांचा धर्मपालनात व्यत्यय आणणं असे नाही. शिवरायांनी कधीही इतर धर्मियांना रोखले नाही, उगाच शासन केले नाही व त्यांचावर विनाकारण कोणतेही अत्याचार होऊ दिले नाही. सगळ्या जातिधर्मासाठी त्यांचे दरबार मोकळे होते. त्यांचा विरोध कोणत्याही धर्माबद्दल नसून वाईट विचार आणि दुराचारीलोकांशी होता. यवन हे दुष्ट असून सामान्य जनतेला विनाकारण त्रास देणारे, लूटपाट करणारे, स्त्रियांचा शीलभंग करणारे होते. यास्तव महाराजांनी त्यांचा विरोधात स्वराज्याची स्थापना करण्याचा विडा उचलला.
 
 
 
3) निःपक्षपात बुद्धी- हा एक अत्यंत विलक्षण गुण आहे जो त्यांचा ठायी होता व त्यांचाबद्दल वाचताना, ऐकताना वारंवार याचा प्रत्यय मिळतो.
 एखाद्याच्या गुणांची पारख करून त्या व्यक्तीला योग्य कामं देणं हे शिवरायांना अचूक जमायचं मग समोर कोणत्याही जाति व धर्माचा माणूस असला तरी ते अत्यंत युक्तिने त्याला कामगिरी सोपवायचे. त्यांच वर्तन निष्कपटी आणि मैत्रीपूर्ण असायचं. आदर व प्रेमयुक्त भाषेत समजवलं आणि एकदा कोणावर विश्वास टाकला की कपटी मनुष्य ही आपला होतो हा त्यांचा सिद्धांत होता. 
 
 
 
4) प्रजेवरचं प्रेम- एक सफल शासकात हा गुण असणे फार आवश्यक आहे. शिवरायांनी राज्यव्यवस्था हा भाग इतक्या उत्कृष्ट रीतिने पार पाडला होता की राम राज्यानंतर लोकं "शिवशाही" चे उदाहरण देतात. 
शेतकरी, व्यापारी, उद्यमी, मजदूर, किंवा यांचाही खालचा माणूस, त्याचे त्रास, त्याचा गरजा हे सगळं ते फार आपुलकी आणि प्रेमाने विचारायचे. त्यांचा उत्कर्ष व्हावा, ते परावलंबी न राहो अशी नीति बाळगून त्यांनी राज्य केलं. प्रजेवर अन्याय करणारा, त्यांना त्रास देणारा कितीही आपला आणि जवळचा असला तरी त्याला कठोर शिक्षा केल्याशिवाय त्यांनी सोडले नाही. त्यांचे अष्टप्रधान म्हणजे आठ रत्नचं होते. महाराजांच्या अनुपस्थितीत पण कोणालाही चुकीचे शासन कधीही होणार नाही याची पूर्ण खात्री त्यांना या आठही माणसांकडून होती. 
 
 
5) स्त्रियांचा आदर- महाराजांच्या कौटुंबिक आणि व्यवहारिक वर्तनातून झळकणारा हा सर्वात मोठा गुण.
 शिवराय निर्व्यसनी तर होतेच, त्याच सोबत त्याचं आचरण सदाचारी होतं. द्रुढनिश्चयी आणि साहसी तर होतेच तसेच कुशल आणि बुद्धिमानही होते परंतु एक गुण हा अत्यंत विलक्षण होता तो म्हणजे स्रियांचा आदर. 
आज आपल्या धर्माला नावं ठेवणारे व अर्धवट ज्ञानाचा जोरावर हे सांगणारे की हिंदूंकडे स्रियांना स्वातंत्र्य नाही, भेदभाव होतो, अश्या सगळ्यांनी शिवाजी महारांजाच चरित्र लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्या समोर हिंदू स्त्री असो किंवा यवन, त्यांनी कधीही अनादर केला नाही. त्यांच्या राज्यात कोणत्याही स्त्रीचा अपमान झाला नाही व ज्यांनी असा पाप करण्याचा प्रयत्न केला तो कोणीही का नसो, महाराजांच्या कठोर शिक्षेतून सुटला नाही. 
 
"शिवशाही"त बायकांना पूर्ण अधिकार प्राप्त होते. कारभारात आणि मसलतीत त्यांचे विचार आणि निर्णय स्वीकारले जात होते. स्वता महाराज जिजाऊंच्या शब्दाबाहेर नव्हते. त्यांच्या पत्नी तसेच सुनांना पण आपलं मत आणि विचार मांडायची मोकळिक होती. कुलमुख्त्यार म्हणून त्यांना मसलती करायची आणि निर्णय द्यायचा अधिकार होता. 
असे शिवरायांच्या गुणांचे वर्णन करावे तितके थोडे. 
आपल्या धर्माच पालन करत, इतर धर्मांचं आदर करणं, आपल्या उन्नती सोबत इतरांची प्रगती व्हावी. आपल्या प्रजेला, सामान्य माणसाला आपल्या कर्तव्याची, धर्म रक्षणाची, धाडसाची व वेळपडली तर हातात तलवारी घेऊन शत्रुला मात करण्याची शिक्षा आपल्याला या चरित्रातून मिळते. 
 
आज भारतातील नेते, पुढारी, राजकारणी लोकांनी आचरणात आणावं असं शिवरायांच जीवन आहे. 
 
शिवरायांनी जे व्रत पाळलं आणि जसे ते जगळे ते आजच्या तरुण मुलांना कळणं हे फार गरजेचं आहे. त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा द्रुष्टिकोन, स्रियांसाठी असलेले आदर, आपुलकी, जिव्हाळा, सगळ्यांना बरोबरीने वागवणं, ह्या प्रत्येक गोष्टीच अध्ययन आणि विचार नितांत आवश्यक आहे. 
 
आज जे काही घडतयं, जी परिस्थिती निर्माण झाली आहे दिल्ली असो हैदराबाद असो किंवा जबलपूर, सगळं विचित्र होत चाललयं. म्हणून आतातरी मागे वळून पहा, इतिहास चाळा, वाचा, लिहा, बोला पण असे गप्प राहू नका
.
About Author
प्रगती गरे दाभोळकर
Writer.... Read More

सर्व पहा

आषाढ अमावस्येला 'दीप अमावस्या' का म्हणतात? जाणून घ्या दिव्यांच्या पूजेचे महत्त्व आणि सोपी पद्धत!

Jivati Puja Naivedya जिवती पूजनाच्या नैवेद्यात काय असावे?, मुख्य पदार्थ नक्की जाणून घ्या

Deep Amavasya Wishes Images: दीप अमावस्येनिमित्त पाठवा हे सुंदर मेसेज आणि डिजिटल शुभेच्छा!

गटारी की दीप अमावस्या? जाणून घ्या या दिवसाचे पौराणिक महत्त्व आणि शास्त्र काय सांगते...

दीप अमावस्येला घरातील कोणते ५ दिवे नक्की लावावेत? मानला जातो मोठा शुभ योग!

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments