Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोबाइल चोरीला गेला किंवा गहाळ झाल्यावर काय करावे ?

Updated: गुरूवार, 13 फेब्रुवारी 2020 (11:34 IST)
या व्यतिरिक्त बरेच पोलीस ऍप्स सुरू आहे. ज्यामध्ये मोबाइल गहाळ झाल्याची तक्रार नोंद करता येते. यासाठी आयएमईआय नंबर, ई मेल आय डी, मोबाइल नंबर,पत्ता आणि मोबाइल संबंधी इतर माहिती द्यावी लागते.

 
आपण आपली तक्रार राज्य पोलीस विभागाच्या वेबसाइट वर जाऊन तक्रार नोंदणी करू शकता. आपण काही सोप्या पद्धतीने तक्रार नोंदवू शकता. आज आपण जाणून घेऊ या की मोबाइल गहाळ झाल्यावर किंवा चोरी झाल्यावर काय करावे....
 
काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत :
1  आयएमईआय नंबर : नवा मोबाइल विकत घेताना सर्वप्रथम त्याच्यावर दिलेला आयएमईआय नंबर आपल्या डायरीत नोंद करून घ्यावा. मोबाइल गहाळ किंवा चोरी गेल्याचा स्थितीत हे अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त ठरतं.
 
2 नेटवर्क ऑपरेटरशी त्वरित संपर्क करणे : नेटवर्क ऑपरेटरशी त्वरित संपर्क करावे आणि त्यांना सांगून आपली सिम बंद करावी. जेणे करून आपल्या सिमचा गैर वापर कोणी करू शकत नाही. त्या मागचे कारण असे की आपल्या सर्व क्रेडिट, डेबिट कार्ड आणि बँकेचे खाते त्या नंबरशी संलग्न असतात. त्याचा कोणीही वापर करू शकतो. 
 
3 सर्व पासवर्ड बदलणे : जीमेल, फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअॅप, हे सगळे मोबाइलच्या सिम वरून चालवले जाते. या साठी गरजेचे आहे की आपले पासवर्ड बदलून आपला डेटा सुरक्षित ठेवणे. 
 
4 तक्रार नोंदणी देणे : ऑनलाईन तक्रार नोंदविल्यावर ज्या भागात मोबाइल गहाळ किंवा चोरी झाला आहे तिथल्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवून एफआयआर  नोंदवल्याची छायाप्रत अवश्य घ्या. त्यानंतरच एफआयआरची स्थिती स्पष्ट होऊ शकते.
 
5 आपल्या बँक किंवा आपल्या क्रेडिट कार्ड कंपनीशी संपर्क साधणे : आपले बँकेच्या व्यवहारासंबंधित डेटा, खाते क्रमांकाविषयी माहिती, आपली बँक, क्रेडिट कार्ड असलेल्या कंपनीची माहिती, यात वापरला जाणारा पासवर्ड या संबंधित माहिती बँकेस देऊन त्वरित सर्व व्यवहार थांबवावे नाही तर कोणीही त्याचा गैर वापर करू शकतो. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

सीएसएमटी आणि सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित रेल्वेगाडी धावणार

सिद्धिविनायक मंदिरातील १८ कोटी रुपयांची देणगी चोरीचा राज ठाकरेंच्या दाव्यावर राज्य सरकार सक्रिय मोड मध्ये

LIVE: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र

मध्य प्रदेश-छत्तीसगडमध्ये रिलायन्स जिओच्या ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या २१ लाखांच्या पुढे

सिद्धिविनायक दान चोरीच्या वादावर भाष्य करणे संजय राऊतांनी टाळले

पुढील लेख
Show comments